शनिवार, २० मे, २०१७

संधी

      नुकतच कॉलेज संपलं.आता पुढे काय हा मोठा प्रश्नच होता.मास्टर्स करायच तर काय विचारता फी जास्त आणि जागा कमी अशी गत मुळी !विचार तर केला होता मास्टर्स चा फोर्म भरायचा पण आरक्षणाच्या गर्दीत जागा उरल्या तर अॅडमिशन मग त्यासोबत साईडबाय साईड सहज जॉबसाठी प्रयत्न करून बघूया अस सहज मनात आल व CV सगळीकडे द्यायला सुरूवात केली.कल्पना नसतानाही अचानक सगळीकडे CV शॉर्टलीस्ट झाला.मुलाखतीसाठी फोन आले.एक एक करत सगळीकडे मुलाखती दिल्या मात्र त्यानंतर कित्येक दिवस प्रतिसाद आलाच नाही.हताश आणि निराश झालेल्या मनात अनेक विचार येऊन गेले.मात्र आई आणि माझा मित्र प्रणित यांनी नेहेमी माझ्या मनात होप्स जागे ठेवण्याच काम कऴत न कळत केलं.
        "तू हुशार आहेस मेहेनती आहेस, तू करू सकतेस अगं! कुठेही नाही मिळाल आता तरी हार नको मानूस पुन्हा छान तयारी कर आणि तुला मिळेल अगं का इतक टोन्सन घेतेस !या वाक्यांनं थोडा धीर यायचा. एक दिवस असचं अचानकपणे एका दिवशी सलग काही मिनीटांच्या अंतराने तीन फोन आले.एक फोन साप्ताहिकातून एक वृत्तपत्रातून आणि एक चॅनल मधून! आता मोठा झोल होता कुठे जाऊ अस झाला होतं.साप्ताहिक आणि वृत्तपत्रात मी या पूर्वी कोणतेच काम केले नसल्याने तिथं कितपत जमेल आणि त्या वातावरणात आपण सर्वाइव करू शकू का याचा विचार करून थोडी ती संधी होल्डवर टाकली आणि चॅनलला जायच अस ठरलं.अजून 5 राऊंड बाकी होते.वृत्तपत्रचे सगळे राऊंड देऊन सिलेक्शन झाल होतं.पण चॅमलच्या प्रत्येक राऊंड नंतर एक वेगळीच भीती होती.
         मात्र  अचानक शेवटचा राऊंड संपल्यावर हातात लेटर मिळालं.आणि पुन्हा ती वाक्य आठवली.या आधी मी केलेल्या अभ्यासाचा आणि एंटर्नशीपच फळच असाव हे.आता मन लावून फक्त काम करायचं खूप शिकायच आणि मी माझ्या इंटरव्ह्यु मध्ये दिलेल्या उत्तराला प्रत्यक्षात साकार कारायच ही इच्छा बाळगून कामाला नव्यान सुरुवात झाली.इथले सगळेच सर आणि मॅम खूप छान समजून घेतात,शिकवतात,ओरडले तरी समजूून सांगतात.इथलं वातावरण खेळीमेळीच आहेच पण तिकतच जबाबदारीचही आहे.त्यामुळे माझी सुरूवात चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही.
विशेष वाटत ते एका गोष्टीच देेव देतो ते भरभरून तस मला संधी आली तेव्हा निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं.ही माझ्या यशाची पहिली पायरी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा