शनिवार, १ एप्रिल, २०१७

अभ्यासाचे तंत्र

अभ्यास करायचा म्हटलं की सगळ्याच्या डोक्याला आठया पडतात.अभ्यास म्हटलं की पोटात गोळा येतो आणि परीक्षेच्या वेळी मात्र कधीही न बोलणाऱ्या किंवा आपण ज्यांच्यावर सतत जळत असतो त्या आपल्याच वर्गातल्या मित्र मैत्रिणींची मदत कशी घ्याची आणि मग त्यासाठी वापरले जाणारे फंडे आठवतात.अभ्यास म्हटलं की येत ते टेंशन आणि नको वाटत त्या परीक्षा;त्याच अभ्यासासाठी काही सोपे आणि मजेशीर फंडे आज मी सांगणार आहे. हे  सगळे फंडे मी स्वतः माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी वापरलेले आहेत. फक्त एक आहे या सगळया फंडयांचा वापर केला तर फायदा नक्की होतो मात्र त्यासाठी नियमित काम करायला हवं आणि थोडा वेळ हि द्यायला हवा.
फंडा 1
SQ4R study
S -survey
Q- questions
R -read
R -react
R -remind
R -rewrite
याशिवाय
पॉकेट डिक्शनरी ज्यात आपण वेगवेगळ्या चिन्हाचा वापर करून किंवा आकृत्यांचा वापर करून उत्तर शॉर्ट मध्ये लिहून ठेवावं.उदा ट्री डायग्राम चा किंवा वेगवेगळ्या डायग्राम चा वापर करावा.या शिवाय आपण जे वाचतो त्याची नोंद कुठेतरी संदर्भासाठी करून ठेवावी.शक्य तेवढे पुन्हा पुन्हा आठवून लिहून काढण्याचा प्रयत्न करावा.फॉर्मुले किंवा समीकरण लक्षात ठेवण्यासाठी वेग वेगळी वाक्य कविता तयार कराव्यात.कोडी खेळ तयार करावेत ज्यामुळे ते सहज लक्षात राहतील.या शिवाय वर्गात शिकवल्या जाणाऱ्या लेक्चर च्या रनिंग नोट्स काढाव्यात.या शिवाय शक्य असल्यास ग्रुप स्टडी करावा त्या मध्ये एखाद्या विषयाला धरून चर्चा केली जावी त्याच बरोबर जो विषय कळला नाही तो ग्रुप मधल्या एकां समजावून द्यावा त्यावर प्रश्न आणि उताराच्या चर्चा कराव्यात जास्त उदा वापर करून ती चर्चा मुद्याला धरून असावी त्यातील महत्वाच्या नोट्स काढाव्यात. सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा केलेला भाग वाचाव व दिवसातून कमीत कमी 3 वेळा तो आठवतो का याचा प्रयत्न करावा. शक्यतो शांततेच्या वेळेत व फ्रेश असताना वाचन करावे. सकाळी किंवा एकदम रात्री आणि बाकी वेळी त्यावर विवेचन चर्चा रिमाईंड लेखन याचा वापर करावा.
सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेछा ...

गुरुवार, ३० मार्च, २०१७

ड्रोन पत्रकारिता

डायरी, टेप रेकॉर्डर, कॅमेरा अशा गोष्टींचा समावेश या आधी पत्रकारितेत पाहायला मिळाला. मात्र या पारंपरिक प्रतिमे नजिकच्या वर्षात अनेक बदल घडलेत. इलेट्रॉनिक मीडियामध्ये ओबी, लाईव्ह यू सारख्या गोष्टींनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला समावेश करून घेतला. सध्याच्या पत्रकारितेमध्ये मोबाईल आणि ड्रोनने आपलं प्रभूत्व प्रस्तापित केलं असं म्हणनं वावगं ठरणार नाही.
    मुळात ड्रोन पत्रकारितेमधला ड्रोन हा आहे तरी काय? तर ड्रोन हा एक असा कॅमेरा आहे जो रिमोटच्या सहाय्यानं हवेत उडत असतो. हे एक छोटसं गॅजेट असतं जे विमानासारखं आकाशात उडतं आणि पत्रकारितेमध्ये महत्त्वाचे जे व्हिजुअल्स असतात. त्या व्हिजुअल्सचे एरिअल शॉटच्या म्हणजेच उंचावरून शॉट्स घेण्याचे काम ड्रोन कॅमेरा करत असतो.

 महाराष्ट्रात ड्रोनचा सर्वाधिक उपयोग हा मराठा मूक मोर्चाच्या वेळी झाला. राज्यात ठिक-ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा मकू मोर्चा काढण्यात आले. यावेळी लाखोंच्या संख्येने जमा झालेल्या लोकांचे दृश्यं टिपण्यासाठी या ड्रोन कॅमेऱ्याचा मोलाचा वाटा होता.
      सध्या तरी ड्रोनचा वापर अशाच काही प्रसंगाच्या वेळी होतो. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईत काही काळासाठी ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोणता उत्सव असो किंवा अशा जागी जिथे सहज जाणं शक्य नाही त्या ठिकाणी ड्रोनच्या आधारे व्हिजवल्स घेता येऊ शकतात आणि आता मोबाईलद्वारे जशी पत्रकारिता होते तशीच भविष्यात ड्रोनमुळे पत्रकारिता करता येईल.

बुधवार, २९ मार्च, २०१७

नटापासून अभिनेत्यापर्यंत...

(काल आमच्या भेटीचा पहिल्यांदाच योग आला.ज्यांना आपण गेले काही दिवस मालिकांमधून आणि या आधी सिनेमा व अभिजात नाटकाच्या माध्यमातून पाहात होते त्यांना आज भेटायची संधी मिळाली.का कोण जाणे पण आता पर्यंत अनेक व्यक्तींना कलाकारांना भेटण्याचा योग्य आला, पण यांच्याशी भेटून गप्पा रंगण्यात जी मजा होती ती काही वेगळीच होती.ज्याला आपण म्हणतॊ ना, नजर आकाशात आणि पाय जमिनीवर अगदी तसाच व्यक्तिमत्व असणारा हा कलाकार! अगदी नटा पासून अभिनेत्यापर्यंत विविध भूमिका साकारणारे श्रीराम कोल्हाटकर.)
    माझ्या एकूणच कारकिर्दीला सुरुवात ही शालेय जीवनापासून झाली.प्रेक्षकांमध्ये नुसत बसून राहण्यापेक्षा नेहेमी समोर जे चालू आहे त्या गोष्टीचा एक आपण भाग व्हावं, हि ईर्षा काही स्वस्त बसू देईना आणि मग राज्यनाट्य स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धा तिथून जी सुरुवात झाली ती अगदी महाविद्यालायपासून ते आतापर्यंत.मला सुरुवातीला कॅरेमऱ्याची खूप आवड होती आणि त्यातही नवीन काहीतरी करायची मग मी वेग वेगळे शो करायचो. कॅमेऱ्यातील सगळं तंत्र शिकून घेतलं,पण नंतर काही कारणाने या सगळ्या माझ्या क्रिएटीव्हीटीवर पाणी पसरलं.त्याला काही पर्सनल कारणही तिकीच जबाबदार होती.पण मला याच क्षेत्रात स्वतःच एक स्थान निर्माण करायचा होत आणि त्या जोडीला पोटापाण्यासाठी पैसे कामावनाही गरजेचं होतं.घरच्यांची म्हणावी तितकी साथ नसल्यानं आता पुढची वाटचाल एकट्यानं कारण भाग होत.पुढे मला दिलीपच्या ओळखीने एका नाटकासाठी छोटा रोल मिळाला. तो रोल छोटा होत्या त्यापेक्षा जास्त त्या नाटकात मला विक्रम गोखलेंसोबत काम करायला मिळणार याचा आनंद जास्त होता.त्या एका नातकातच आमची ओळख खूप चांगली झाली आणि त्या नंतरची बरीच नाटके हि मला त्यांच्यासोबत करायला मिळाली हे माझं भाग्य होतं.मी सिरीयल केल्या चित्रपट केले पण आजही मला ती अभिजात नाटक जास्त भावतात आवडतात, त्यात जास्त काम करायला आवडत.कसा असत ना तुम्ही सिनेमा करा किंवा सेरीयल आपण त्या चॅनेल च्या हातातले भावले असतो पण नटाला मात्र नाटकातील पात्रच आणि कथेला अनुसरून अभिनय करण्याची मुभा असते.तुम्ही खूप पात्र जगता फुलवता आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांच एक वेगळे पण निर्माण करता.याच उदा द्यायचं तर विक्रम गोखलेंच बॅरीस्टर नाटक त्यात त्यांनी जी भूमिका रंगवलीय ती आजही तशीच डोळ्यासमोर उभी राहते.
एकूणच साध्याच एकंदर हे पाहता सगळंच कुठेतरी मागे पडतंय असं वाटत आहे.आजही माझ्या घरी TV  नाही कारण आज आपल्याला विचार करायलाच नको आहे,फक्त त्या खोक्या समोर बसून स्वतःच मनोरंजन करायचं बिनबोभाट ; त्या पलीकडे आज मुलांना वाचायला आवडत नाही. चांगल्या गोष्टी या तेवढ्या पुरत्याच राहतात, खर तर मला तुमच्यासारख्या नव तरुणांशी मैत्री करायला आणि गप्पा मारायला खूप आवडतं त्यांच्यात काहीतरी करण्याची धमक असते ताकद असते ऊर्जा असते आणि तीच मलाही मिळत असते.फक्त दुःख याच वाट की त्यांना सगळ्या गोष्टी झटपट हव्या असतात माहिती नुसती नको असते वाचन नको असत पण तेच विझुवल गोष्टी खूप पटकन एक्ससेप्ट करता.याला कारण ही जनरेशम गॅपच आहे. पण तितकीच उत्तम विचार आणि नवनिर्मितीची ताकद आहे.फक्त याला चांगल्या वाचनाची योग्य जोड द्यावी आणि जास्त आव्हानात्मकपणे सद्याच्या गोष्टी मांडल्या जाव्यात; त्याची सुरुवात झाली आहे असा म्हणायला हरकत नाही.
शब्दांकन - क्रांती कानेटकर

भर उन्हात काम...मगार

मेगाब्लॉक, जम्बोब्लॉक कशासाठी? कोणासाठी?
'रोड मरे त्याला कोण रडे' असं म्हणत आपण नेहमीच रेल्वे प्रशासनाला आणि सेवेला नाव ठेवत असतो. दर रविवारी मेगाब्लॉक घेऊन लोकल उशिरा होतात कश्या? लोकल रुळावरून घसरतेच कशी? असा प्रश्न देखील आपण वारंवार करतो. मात्र खाली दिलेल्या या छायाचित्राकडे जरा पाहा...

प्रत्येक रविवारी हे रेल्वे कामगार भर उन्हात काम करत असतात. भर उन्हात फक्त हेच कामगार काम करतात असं मुळीच नाही. मात्र रेल्वे सेवा सुरळीत रहावी. प्रवाशांना वेळेत पोहोचता यावं यासाठी हे रेल्वे कामगार काम करत असतात.
      आता राहिला प्रश्न होता रेल्वेच्या सेवेचा. बऱ्याचदा लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला पहिलं प्राधान्य दिल्यामुळे रेल्वे उशिरानं धावतात. तर काही वेळा क्रॉसिंग करताना रेल्वे रुळावरून डब्बे घसरतात. दोन्ही रेल्वे रुळांमधील क्रॉसिंग करतानाचे अंतर आणि दिवसा उष्ण आणि रात्री दमट तापमानामुळे रेल्वे रुळ हे आकुंचन पावतात. त्यामुळे रेल्वे रुळाला तडे जातात. अशा अनेक कारणांमुळे मध्य असो अथवा पश्चिम किंवा हार्बर मार्गावर रेल्वे सेवा उशिरानं असतात.
     प्लॅटफॉर्मवर लोकल उशिरा येत असल्याचं कळताच ही लोक दर रविवारी कसलं काम करतात, असा चिडखोर प्रश्न स्वत:लाच विचारतो. पण मुळात आपण जो काही प्रवास करतो तो याच रेल्वे कामगारांमुळे करतो. मग दोष तरी कुणाचा? तर दोष आहे तो त्या बड्या अधिकाऱ्यांचा जो लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला आधी हिरवा सिंग्नल देतात आणि नंतर मुंबईकरांना. मेगाब्लॉकच्या दिवशी हा कामगार योग्य ते काम करतो. मात्र मेहनत घेऊनही आपण या रेल्वेसेवेची धुरा असणाऱ्या अधिकाऱ्याला दोष न देता या रेल्वे कामगाराला देतो.

बाळकडू

      मुंबई... स्वांतत्र्यानंतर या मुंबईवर अनेकांनी आपला हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला. मुंबई सोन्याचं अंड देणारी मुंबई! कधी ही न थांबणारी मुंबई! मात्र इथेच जन्मलेल्या मराठी माणसाला या मुंबईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला. इथे राहणाऱ्या भूमिपुत्रावर होणारा अन्याय हा दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी सर्व सामन्यांचे डोळे उघडण्या आधीच पाहिला होता. या मराठी माणसासाठी... मराठी अस्मितेसाठी 1965मध्ये उभी राहिली ती शिवसेना.
  पण मुद्दा हा एका राजकीय पक्षाचा नाही आहे... मुद्दा आहे तो बाळासाहेबांनी ओळखलेल्या आणि लक्षात आलेल्या मराठीच्या अस्थित्वाचा आहे.
    वादाची गोष्ट म्हणजे मराठी माणसाचे मुंबईमध्ये असलेलं अस्तित्व, पहिल्यासारखचं आहे का? प्रश्न आहे मराठीचा, मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा. गेले कित्येत वर्षांपासून मराठी माणूस हा मुंबईमधून बाहेर फेकला गेला आहे. जागेच्या अभावामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे, तर कधी येणा-या लोंढ्यांमुळे मराठी माणूस हा बाहेरचं फेकला गेला आहे.
    पण मराठी माणूस का फेकला गेला? तर खरं येथे असणाऱ्या गिरण्या-मिल्समालकांच्या कारस्थानावरून हथबल होऊन संप करून मराठी माणूस खचत चालेला. मोडेन पण वाकणार नाही, ही तर सुरूवात होती. पोटा-पाण्यासाठी आणि बायका-पोरांसाठी मुंबईत राहणारा मराठी माणूस हा आपले घरदार विकून नाईलाजाने मुंबईच्या बाहेर जात होता.
   कालांतराने इथल्या जागा गुजरात्यांनी, पंजाब्यांनी, मारवाड्यांनी बळकावल्या. मद्रासांनी हॉटेलस् काढले. तर गुजरात्यांनी शेअरबाजारात जोर धरला होता. प्रत्येकाने आपआपले उद्धोग चालू केले. आणि मराठी माणूस त्यांच्या हाताखाली काम करू लागला. आपल्याचं मातीतं दुसरा येऊन एखादा उद्दोग सुरू करतो आणि भूमिपूत्र त्याच्या हाताखाली काम करतो ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते. खर तरं आपल्या मराठी माणसाचे चुकले होते. आहे! त्याला उद्योग करता आला नाही. म्हणून तो चाकरमानीचं राहिला.
     बाळासाहेबांनी ह्या माणसाला झोपेतून जागं केलं आणि बाळकडू नावाचे शस्त्र दिले. तरीही मला असे का वाटे की, मराठी माणूस अजून झोपून आहे. येथील सत्ताधारी आपला कितपतं विचार करतात. ह्यांना आपण मतदान करून जिंकूण देतो का परप्रांतीय. असो!!



     आपले मराठी मुल देखील शिकले आहे. आपल्याकडे साहित्य आहे. शिक्षण आहे. आपण पण कशात कमी नाही आहोत. आता गरज आहे ती पुन्हा उभ राहण्याची, शिक्षणाच्या जोरावर प्रभूत्व मिळवणयाची. कोणासाठी तर... मराठी माणसासाठी.

मंगळवार, २८ मार्च, २०१७

शेतकरी असणं गुन्हा आहे का?

   सुका दुष्काळ, ओला दुष्काळ आणि गारपीट अशा अनेक प्रसंगाना सामोरा जाणारा शेतकरी. आपल्या मेहनतीतून घामातून लोकांसाठी पिक पिकवणाऱ्या या शेतकऱ्याच्या वाटेला नेहमी संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष का असतो? वर्षभरात कमवलेले, कर्ज काढलेले पैसे शेतीसाठी वापरूनही शेतकऱ्याच्या हाती 50 टक्केही पिक हाती लागत नाही. अशातच शेतकरी आपला उदरनिर्वाह कसा करतो? त्याच्या कुटुंबाचं होत काय? एवढेचं प्रश्न आपण विचारतो.
    गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यानं आधी आसमानी आणि मग सुलतानी संकटांना तोंड दिलं. सुरु असलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक भाजप सरकारच्या हात धुवून मागे लागलेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जासाठी तरतूद करतं, पण कर्जमाफी करत नाही.
|| एक दिवस सर्व किंमती वस्तू घराबाहेर ठेवून पाहा ||
|| शेतकरी काय असतो समजे ||
   
शेतकरी वर्षभर आपल्या शेतात सोनं पिकवत असतो. राखण करतो. स्वत:च्या काळजावर दगड ठेवून उभ्या पिकाचं रक्षण करतो. काही वेळेला गारपीट, दुष्काळ आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल होतो. तर काही वेळेला हाती पिक असूनही योग्य हमी भाव न मिळाल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो.
     शेतकऱ्याला कुटुंबं नाही का? त्याला त्याचा संसार नाही का? खरचं शेतकरी असणं गुन्हा आहे का? जर शेतकरीच संपावर गेले तर त्यांच्या अन्न धान्यांवर जगणारे. काय होईल आपलं?