रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

स्वल्पविराम

कॉलेज ची बेल वाजली नुकताच कॉलेज सुटल होत.माझा काही आज वर्गात लक्ष लागत नव्हतं. मला राधाने हलवलं. मी एकदम दचकले आणि तीने माझ्याकडे बघितलं.सगळीकडे शांतता पसरली,पण क्षणभरच...
काय ग कुठे हरवलीस ?
काय बोलावे हे न सुचल्याने मी गडबडले जणू सगळे शब्दच नाष्ट झाल्यासारखे.आज कॉलेजचा तिसरा दिवस,आम्ही आमचा सगळा ग्रुप एकत्र भेटायचं ठरवलं होतं. ग्रुप तास शाळेतलाच हो, पण परीक्षा संपल्यानंतर सगळे जण सुट्टीसाठी आपल्या गावी गेले. मग फारस भेटन झाल नाही.तसे ग्रुपमधले सगळे हुशार पण तितकेच मस्तीखोर आणि उत्साही, जीवाला जीव देणारे.शाळेत सगळ्यांचा लाडका असणारा ग्रुप होता.कोणताही काम असो किंवा अभ्यासाच्याच्या बाबतीत असो कायम पहिलं नाव घ्यायचे ते आमच्याच ग्रुपचं, हे आमच्या ग्रुपचा एक वैशिष्ट्य होत म्हणा ना ; पण आता मात्र आम्ही वेगवेळग्या शाखांमध्ये शिकायला होतो. जरी वेगळे असलो तरी मनं मात्र एक होत.माझ्या मनात अनेक विचार अजूनही घोंगावत होते आणि त्याच संभ्रमित आवस्थेत आम्ही वर्गाच्या बाहेर पडलो.
"ए हाय...!कशी आहेस?"
"ओ मॅडम कुठे हरवलाय लक्ष कुठे आहे तुमचं?"
पारस एकदम समोर आला आणि त्याने टिचकी वाजवली.
हा पारस म्हणजे एकदम मस्तीखोर! पण तो असा जरी असला तरी मनं एकदम निर्मळ आणि खूप धमाल करणार आहे.दुसऱ्याच दुःख ते आपल आणि सागळ्याना जीव भावाची साथ देणारासुद्धा...
"ए काय आल्यापासून बघतोय लक्ष कुठेय तुझ अग?
विसरलीस कि काय आम्हाला?तुझ्याशी बोलतोय मी" असा म्हणत त्याने पुन्हा एकदा टिचकी वाजवली.त्याच्या त्या आवाजाने माझ्या विचारला मात्र तूर्तास लगाम बसला खरा आणि मी हसून म्हटलं,
"हा तास काहीच नाही अरे !"
"काय मग झाली का सगळी प्रक्टिकल्स वगरे ?"
"आज काय झाल मग लेकचरला?"
"आता काय बाबा माजा आहे तुझी तुला हव ते सगळं मिळाल तुझ्या मनासारखं ! "
मी अगदीच विषय टाळायाचा म्हणून विचारलं.
"काय मग आता कॅलसेस असतील ना तुझे जाणार नाहीस का आज ?"
हो ना यार...!😣
"ए पण तुला काय झालंय तुझ तोंड पडलेलं का आहे अस क्लास मध्ये काही झालं का बोल ना
ए सांग ना काय झालं?"
आज सगळे कधी नवे ते सगळे भेटणार होते आणि त्यात मला माझा प्रॉब्लेम सांगून सगळ्यांचा मूड खराब नव्हता करायचा ...
इतक्यात हर्ष आला.आता हा हर्ष म्हणजे आमचा सगळ्यांचा खूप लाडका मित्र तो सायन्सला आहे. मुळातच कुशल बुद्धिमत्ता असणारा हा हर्ष सगळीकडे आपली सायंटिस दुष्टी जागृत ठेऊन निष्कर्ष काढणे हा त्याचा धंदा...
तो आला तेव्हा माझा फारस लक्षही नव्हतं. तो काहीतरी सगळ्यांना सांगत होता. मी मात्र स्वतःच्याच विचारात..
"काय ग घरी काही प्रॉब्लेम झालाय का ?"
सगळ्यांचं तेच चालू होत; मी शेवटी वैतागून म्हटलं, नाही रे काही नाही झालाय.
"काय नाही रे घरचे ओरडले असतील नाहीतर भांडून आली असेल अजून काय असणार ...! स्पृहा
हळूहळू सगळे जण जमायला लागले प्रतिमा, स्पृहा, हर्ष केदार ,प्राची आणि मी असा आमचा ग्रुप ...प्रतिमा फार बोलणारी नाही,तर स्पृहा एकदम शांत कधीतरी एकदमच बॉम्ब फेकल्यासारखं मधेच काहीतरी बाडबडणारी...केदार तसा शॉर्ट टेम्पर होता
पटकन चिडणार पण बाकी मनान चांगला होता! आता सगळे शांत झाले होते आणि मी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होत.
मी उगीचच विषय पुन्हा टाळायचा म्हणून म्हटलं चला क्लासला उशीर होतोय जातंय ना तुम्ही मलाही लवकर. घरी जायचंय वाट पाहत असतील घरी निघूया?
केदार आधीच चिडलेला होता, त्यात माझ्या अश्या बोलण्यावर तो अजून वैतागला.
त्याने मग बोलायला सुरुवात केली, "जाऊदे ना ,नाही सांगायचं तर नको सांगू इथे सगळे जण तुझ्यासाठी थांबलेत आणि तू सोड!"
तो चांगलाच वैतागला होता. त्याचे तुटक शब्द माझ्या कानावर पडत होते. तो म्हणत होता काही तरी की, त्याच्या आई वडिलांनचा असा मत होत, त्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यावा मात्र त्याचा हट्ट होता कंपनी सेक्रेटरी होण्याचा. त्यानं घरच्यांच्या मन विरुद्ध कॉमर्सला ऍडमिशन घेतले. त्यामुळे घरचे आता रोज त्याला त्यावरून ऐकून दाखवतात रोजचा वाद असतो घरी आणि मग हा वैतागतो.
"शांत हो रे! या सगळ्याचा राग तिच्यावर काढून काय होणार आहे सांग मला ...",एक जण
आता मात्र एक क्षण सगळीकडे खूप शांतता पसरली. मी काय बोलते या कडे सगळेजण पाहत होते. मला सुरुवात कुठून करावी हेच सुचेना मग मी बोलायला हळू हळू सुरवात केली.
त्याच असं आहे की मला अर्टसला जायचा होत. खूप काही करायचंय रे मला हे कॉमर्स नको होत. पण आई बाबा ऐकायलाच तयार नाहीत, त्यांचही एका अर्थी बरोबरच आहे म्हणा, बीकॉम केल्यावर नोकरी पटकन मिळते आणि शिवाय आम्ही दोघीही मुलीच सो पुढच्या खर्चाचा विचार करता त्यांनी त्याच्या बाजून विचार केला. पण मला नाही हे मनापासून कारावास वाटत. इतक एका श्वासात बोलल्यानंतर मात्र माझ्या मनाचा बांध फुटला प्रत्येकाचेच काही ना काही प्रॉब्लेम्स होते, आणि आम्हीच एकमेकांचे सोबती होतो.
खरंच कधी कधी आपले पालक आपल्या पातळीवर येऊन का नाही विचार करत! खरच अस झाल असता तर ...
"जाऊदे .. जर तर च्या गोष्टी झाल्या अग या! असुदे पण तुला अश्या कितीतरी गोष्टी या व्यतिरिक्तही करता येतील कि म्हणजे इव्हेंट्स लेखन आणि स्पर्धा ही हा फक्त तुला घरी न सांगता करावं लागेल हे खरं ",स्पृहा
ते तर आहेच ; आता आपण आपल्या शाखा तर बदलु शकत नाही ; पण आहे त्यातून काहीतरी वेगळं एकमेकांच्या मदतीनं नक्कीच करू शकतो. ठरल तर मग आपल्या आनंदाचे मार्ग आपणच शोधायचे ! अस म्हणून नव्या उमेदीने मन जागा झाल.एक खूप चांगला संकल्प करून आम्ही सगळे कॉलेज च्या बाहेर पडलो .आजचा रस्ताही तोच होता झाडंही तीच वर्दळ हि नेहेमीचीच पण आज सगळंच कसा वेगळा आणि मोकळ वाटत होत.घर कधी आल ते कळलंच नाही. आई दारात वाट पाहतच उभी होती ."काय ग किती उशीर? लवकर यावा,आज तुझ्या आवडीची मस्त खीर केलीय जा लवकर हात पाय धूऊन घे ..."
अरे वा ! ,मी.
"काही नाही ग असाच आज  सगळे जण भेटलो मग गप्पा झाल्या तुला माहितेय का ....",मी.
माझी अखंड बडबड पुन्हा चालू झालेली पाहून आईला आज खूप बार वाटलं. इतके दिवस शांत असणारी मुलगी आज आईशी खूप मनमोकळेपणाने बोलत होती. आईच्या डोळ्यात दोन क्षण पाणी आलं आणि ती तशीच माझ्याकडे पाहत  उभी राहिली ;कारण आज तिला तिची मुलगी खऱ्या अर्थाने परत मिळाल्यासारखी होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा