Sunday 27 January 2019

एकच प्याला...

एकच प्याला...
राम गणेश गडकरींनी एकच प्याला हे नाटक मद्यपान आणि त्याचे दुष्परिणाम सांगणारं ज्वलंत विषयावर 1917 साली लिहिलं. राम गणेश गडकरींना महाराष्ट्राचे शेक्सपिअर असंही म्हटलं जातं. त्यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी एकच प्याला हे नाटक आजही तितकच एव्हरग्रीन आहे.एकच प्याला हे पाच अंकी संगीत नाटक आहे.यात तळीराम हे मुख्य पात्र तर सुधाकर,सिंधू,रामलाल ही दुय्यम पात्रांची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. पहिल्या अंकात सुधाकर सिंधू आणि रामलाल यांच्यातला संवाद विलायतेला शिकायला जाणारा रामलाल व त्याच्या काळजीपोटी विचारपूस करणारी सिंधू, तर स्त्रीलाचं प्रियजनांची काळजी असते. तिच्या मनात नेमकं काय चालंलं आहे, हे कधीही न ओळखता येणारा असा संदेश देणारी सुधाकरची वाक्य.
      दुसऱ्या अंकापासून मूळ कथेला सुरुवात होते. मदिराधुंद अवस्थेत असणारा तळीराम आणि मदिरेचे तमाम फायदे.तळीरामची काही वाक्य तर आजच्या काळाशी इतकी तंतोतंत जुळणारी आहेत की कदाचित समाजातल वास्तव बदललंचं नसाव हा भास क्षणासाठी मानाला होऊन जातो. वास्तवदर्शी परिस्थितीला मार्मिक विनोदाची झालर घालून समाजातील घटना आणि वास्तव वारंवार आपल्यासमोर उभं राहातं. 'नशेबाज व्यक्ती कधी खोट बोलत नाहीत.त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही कारण त्यालाच काही समजत नसतं. चोरीच्या बाबतीत तो मूर्ख असतो.दारु प्यायला की गुलामाचा राजा होतो.' या सारखी वाक्य थोडा विचार केला तर आपल्याला आजच्या काळाशीही तितकीचं रिलेट करता येतात. तळीरामचं एकचं प्यालामधलं एक वाक्य तर खूप सुंदर आहे.'पूर्वी नाटकाचं चित्र वास्तरुपी संसारात दिसायचं, आता संसाराचं नाटकासारखे होत आहेत'. ''रंगभूमीच्या  आणखी प्रेक्षकांच्या मध्ये दिव्यांची एक धगधगीत अग्निरेषा असते. नाटयसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रितीविवाह सत्यसृष्टीत उतरलाम्हणजे त्याचे पोरखेळ निम्मे दरानंसुध्दा पाहण्याच्या लायकीचे नसतात. लोक म्हणतातनाटक हे संसाराचं चित्र आहे. पण मी म्हणतो कीहल्ली संसार हे नाटकाचं चित्र बनत चाललं आहे! प्रितीविवाहाच्या पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी काडीइतकाही संबंध नसतोकिंवा काडीइतकाच संबंध असतो. प्रितीविवाह हा द्वंद्वसमास असून वकिलामार्फत त्याचा विग्रह करून घ्यावा लागतो. लग्नाच्यापूर्वी प्रेमाची आषुकमाषुकं हातात हात घालून भटकण्यासाठी जी तळमळत असतातनुसती पायधूळ दृष्टीस पडण्यासाठी ज्या उत्कंठतेने एकमेकांच्या वाटेकडे डोळे लावून बसताततीच पुढं एकमेकांच्या डोळयात धूळ फेकण्यासाठी संधी पाहात असतात! चुंबनासाठी तोंडाला तोंड भिडवणारी जोडपी पुढं एकमेकांची तोंडं पाहताच चावू की गिळूअसं करायला लागतात.''आजही ती तळीरामची वाक्य आठवून पाहिलं तरी समाजात घडणाऱ्या घटनांचा संदर्भ लागतो.म्हणजे लेखकाच्या प्रगल्भतेची वेळोवेळी जाणीव होते.
      नाटकाचं कथानक पाहायला गेलं तरी अगदी सरळ आहे 2 कुटुंब एक सुधाकर सिंधू आणि त्यांचं तान्हं बाळ आणि दुसरं तळीराम आणि त्याची पत्नी.तळीराम मदिरेत उन्मत्त होऊन बुडालेला स्वतंत्र माणूस, गंगा नवऱ्याला वास्तवाचं भान देणारी पण तितकीचं तोंडानं फटकळ एक सोशीक स्त्री.जिच्या घरी मदिरेमुळे सोन्याच्या लंकेच रामाच्या वनवासात रुपांतर झालं.घरी अठराविश्व दारिद्र हातावर पोट असणारी आणि नवऱ्यापायी कंटाळलेली मात्र तरीही नवऱ्याचं करणारी स्त्री.सुधाकर कचेरीत चांगल्या पदावर काम करणारा नोकरदार घरी गडगंज श्रीमंती पण स्वभावात मात्र अहंकार.सिंधू एक सोशीक पतीव्रता स्त्री. जी पतीच्या एका शब्दाबाहेरही न जाणारी, पतीच्या सेवेत आपली धन्यता आणि सुख माननारी सिंधू.जी पत्नी ताई आणि आई अशा तिनं भूमिका कोणतीही कसर न करता भरुन काढणारी असते.मात्र सुधाकराच्या एका निर्णयानं सिंधूची होणारी फरपट,तरीही पतीव्रता जपणारी अशी सोशीक सिंधू.आज आपल्या अवतीभवती अशी लोकं पाहायला मिळतात आणि त्यात तीळ मात्रही शंका नाही हे खरेचं!
      एकदा सुधाकराचा अपमान होतो.तो अपमान पचवण्यासाठी सुधाकर या एकच प्याल्याची मदत घेतो आणि ती मदत घेण्यासाठी तळीराम त्याला मदत करतो.तळीरामाच्या आग्रहापोटी तो एकचं प्याला घेतो. त्याच्या एकाच प्याल्यानं संमोह अवस्थेची सुरूवात होते.त्यानंतर वरचेवर मदिरा घेणं, आर्य मदिरा मंडळाच्या बैठकींना बसणं असा टप्पा वाढून तो उन्माद अवस्थेपर्यंत येतो.या उन्माद अवस्थेत सुधाकराला आपली चूक कळते आणि तो सिंधूची माफी मागून पुन्हा मदिरा न घेण्याचं वचन देतो.सुधाकराच्या मनावर ताबा असला तरी उन्माद अवस्थेत मात्र त्याच्या शरीरावर मात्र ताबा राहात नाही.त्यामुळे तो त्याची प्रतिज्ञा दारु पिऊन मोडतो.आणि पुन्हा सिंधूकडे पैसे मागायला येतो.दारुपायी सोन्याची लक्षी लकेत रुपांतर झालेली कष्ट करुन पैसै मिळवून स्वत:चं पोट भरणाऱ्या सिंधूकडे कुठे असणार पैसे.पण सुधाकराला परिस्थितीचं भानंच नाही तो मात्र प्रलयावस्थेत पोहचलेला असतो.दारुशिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही.त्या दारुनं आपले प्राण जातील याचं भानही तो विसरतो.सिंधू पैसे देऊ शकत नाही त्यामुळे तीच्या बाळाला आणि सिंधूला सुधाकर काठीनं मारतो.आणि त्यातचं सिंधूचा मृत्यू होतो.शेवटी भानावर आलेल्या सुधाकराला आपली चूक कळते मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.तोही स्वत:चं जीवनं मदिरेत कापूराचं विष घालून आपलं जीवन संपवतो.
      दारु वाईट आहे की चांगली. हा प्रश्न कायमच अनुत्तरीत राहीलाय..काही जण स्टेटस म्हणून काहीजण निराशा संपवण्यासाठी काही जण सवय म्हणून तर काही जण आग्रहापोटी त्या मदिरेचा एकच भरलेला प्याला घेतात आणि त्या एका प्यालात उन्मत्त झालेल्या प्रलयकारी समुद्रासारख्या खवळत्या कडवटपणाला पचवण्यासाठी प्रत्येक रिकामा प्यालाला भरुन पेगवर पेगवर पेगवर पेग घटके मोजत घेतचं राहतात..हे समाजातील सगळ्यात मोठ दुर्दैवं आहे. या नाटकानंतर अनेक व्यसनमुक्ती केंद्र पथनाट्य सम्मोहन ह्यासारख्या अनेक गोष्टी शासनानं राबवल्या.मात्र आजही गावापासून शहरापर्यंत दारु घेऊन अनेक स्त्रीयांचा संसार आयुष्य कित्येक मुली तर बलात्काराच्या बळी बनल्या आबेत.आजही मदिरेत अखंड बुडालेल्या नवऱ्याचं अस्तित्व समाजात टिकण्यासाठी स्त्री जीव तोडून प्रयत्न करते.तळीरामच्या नाटकातील गंगेचं रुपही धारण कतरणाऱ्या स्त्रीया आहेतचं पण त्यांच्या हाती मात्र अपयश किंवा गरीबीच येते. आजही सिंधूसारख्या मुक गिळून गप्प बसणाऱ्या स्त्रीया पतीव्रता सोशीकता तशीच आहे. बदलला तो फक्त दृष्टीकोन, हेतू, आणि नावं मात्र आजही एकच प्याला तसाचं आहे कोणासाठी भरलेला तर कोणासाठी रिकामा...भरलेल्या प्याल्यानं सुधाकराचं आयुष्यात प्रलय आला.तर रिकाम्या प्याल्यानं सुधाकर आणि सिंधूचं आयुष्य रिकामं केलं.
  शेवटी काय मोह वाईट.मग तो कोणत्याही गोष्टीचा असो.खाण प्रेम पीण किंवा अजून काहीही म्हणूनच तर मनाला घोड्याची उपमा देतात..चौफेर मोहीत होणाऱ्या मनावर ताबा मिळवणं कठीणचं.अगदी शेवटी म्हणायचं तर याचं एकचं प्याला मधलं सुंदर वाक्य दारु एकदा प्यायली की सुटत नसते.ती सुटण्याची एकचं वेळ दारु प्यायच्या आधीची. मोहात पडण्याआधीच त्यावर कंट्रोल ठेवता आला तर उत्तम. किंबहूना त्यातचं आपलं भलं असतं शेवटी सगळ मृगजळचं म्हणा....फक्त आपण कोणत्याही मोहात न पडता आणि पडलातचं चर वेळीचं संमोह अवस्थेत सावरता येण महत्त्वाचं नाहीतर तोचं मोह आपला विनास करतो आणि म्हणूनचं एक श्लोक मला जाता जाता आठतो... विनाशकाले विपरीत बुद्धी....
   या प्रकल्पासाठी मी युट्यूवरील नाटक पाहिले.आणि गुगलवरील एकचं प्याला पुस्तकाची प्रत वाचली.
क्रांती रवींद्र कानेटकर


                                                                 

No comments:

Post a Comment