रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

स्वल्पविराम

कॉलेज ची बेल वाजली नुकताच कॉलेज सुटल होत.माझा काही आज वर्गात लक्ष लागत नव्हतं. मला राधाने हलवलं. मी एकदम दचकले आणि तीने माझ्याकडे बघितलं.सगळीकडे शांतता पसरली,पण क्षणभरच...
काय ग कुठे हरवलीस ?
काय बोलावे हे न सुचल्याने मी गडबडले जणू सगळे शब्दच नाष्ट झाल्यासारखे.आज कॉलेजचा तिसरा दिवस,आम्ही आमचा सगळा ग्रुप एकत्र भेटायचं ठरवलं होतं. ग्रुप तास शाळेतलाच हो, पण परीक्षा संपल्यानंतर सगळे जण सुट्टीसाठी आपल्या गावी गेले. मग फारस भेटन झाल नाही.तसे ग्रुपमधले सगळे हुशार पण तितकेच मस्तीखोर आणि उत्साही, जीवाला जीव देणारे.शाळेत सगळ्यांचा लाडका असणारा ग्रुप होता.कोणताही काम असो किंवा अभ्यासाच्याच्या बाबतीत असो कायम पहिलं नाव घ्यायचे ते आमच्याच ग्रुपचं, हे आमच्या ग्रुपचा एक वैशिष्ट्य होत म्हणा ना ; पण आता मात्र आम्ही वेगवेळग्या शाखांमध्ये शिकायला होतो. जरी वेगळे असलो तरी मनं मात्र एक होत.माझ्या मनात अनेक विचार अजूनही घोंगावत होते आणि त्याच संभ्रमित आवस्थेत आम्ही वर्गाच्या बाहेर पडलो.
"ए हाय...!कशी आहेस?"
"ओ मॅडम कुठे हरवलाय लक्ष कुठे आहे तुमचं?"
पारस एकदम समोर आला आणि त्याने टिचकी वाजवली.
हा पारस म्हणजे एकदम मस्तीखोर! पण तो असा जरी असला तरी मनं एकदम निर्मळ आणि खूप धमाल करणार आहे.दुसऱ्याच दुःख ते आपल आणि सागळ्याना जीव भावाची साथ देणारासुद्धा...
"ए काय आल्यापासून बघतोय लक्ष कुठेय तुझ अग?
विसरलीस कि काय आम्हाला?तुझ्याशी बोलतोय मी" असा म्हणत त्याने पुन्हा एकदा टिचकी वाजवली.त्याच्या त्या आवाजाने माझ्या विचारला मात्र तूर्तास लगाम बसला खरा आणि मी हसून म्हटलं,
"हा तास काहीच नाही अरे !"
"काय मग झाली का सगळी प्रक्टिकल्स वगरे ?"
"आज काय झाल मग लेकचरला?"
"आता काय बाबा माजा आहे तुझी तुला हव ते सगळं मिळाल तुझ्या मनासारखं ! "
मी अगदीच विषय टाळायाचा म्हणून विचारलं.
"काय मग आता कॅलसेस असतील ना तुझे जाणार नाहीस का आज ?"
हो ना यार...!😣
"ए पण तुला काय झालंय तुझ तोंड पडलेलं का आहे अस क्लास मध्ये काही झालं का बोल ना
ए सांग ना काय झालं?"
आज सगळे कधी नवे ते सगळे भेटणार होते आणि त्यात मला माझा प्रॉब्लेम सांगून सगळ्यांचा मूड खराब नव्हता करायचा ...
इतक्यात हर्ष आला.आता हा हर्ष म्हणजे आमचा सगळ्यांचा खूप लाडका मित्र तो सायन्सला आहे. मुळातच कुशल बुद्धिमत्ता असणारा हा हर्ष सगळीकडे आपली सायंटिस दुष्टी जागृत ठेऊन निष्कर्ष काढणे हा त्याचा धंदा...
तो आला तेव्हा माझा फारस लक्षही नव्हतं. तो काहीतरी सगळ्यांना सांगत होता. मी मात्र स्वतःच्याच विचारात..
"काय ग घरी काही प्रॉब्लेम झालाय का ?"
सगळ्यांचं तेच चालू होत; मी शेवटी वैतागून म्हटलं, नाही रे काही नाही झालाय.
"काय नाही रे घरचे ओरडले असतील नाहीतर भांडून आली असेल अजून काय असणार ...! स्पृहा
हळूहळू सगळे जण जमायला लागले प्रतिमा, स्पृहा, हर्ष केदार ,प्राची आणि मी असा आमचा ग्रुप ...प्रतिमा फार बोलणारी नाही,तर स्पृहा एकदम शांत कधीतरी एकदमच बॉम्ब फेकल्यासारखं मधेच काहीतरी बाडबडणारी...केदार तसा शॉर्ट टेम्पर होता
पटकन चिडणार पण बाकी मनान चांगला होता! आता सगळे शांत झाले होते आणि मी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होत.
मी उगीचच विषय पुन्हा टाळायचा म्हणून म्हटलं चला क्लासला उशीर होतोय जातंय ना तुम्ही मलाही लवकर. घरी जायचंय वाट पाहत असतील घरी निघूया?
केदार आधीच चिडलेला होता, त्यात माझ्या अश्या बोलण्यावर तो अजून वैतागला.
त्याने मग बोलायला सुरुवात केली, "जाऊदे ना ,नाही सांगायचं तर नको सांगू इथे सगळे जण तुझ्यासाठी थांबलेत आणि तू सोड!"
तो चांगलाच वैतागला होता. त्याचे तुटक शब्द माझ्या कानावर पडत होते. तो म्हणत होता काही तरी की, त्याच्या आई वडिलांनचा असा मत होत, त्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यावा मात्र त्याचा हट्ट होता कंपनी सेक्रेटरी होण्याचा. त्यानं घरच्यांच्या मन विरुद्ध कॉमर्सला ऍडमिशन घेतले. त्यामुळे घरचे आता रोज त्याला त्यावरून ऐकून दाखवतात रोजचा वाद असतो घरी आणि मग हा वैतागतो.
"शांत हो रे! या सगळ्याचा राग तिच्यावर काढून काय होणार आहे सांग मला ...",एक जण
आता मात्र एक क्षण सगळीकडे खूप शांतता पसरली. मी काय बोलते या कडे सगळेजण पाहत होते. मला सुरुवात कुठून करावी हेच सुचेना मग मी बोलायला हळू हळू सुरवात केली.
त्याच असं आहे की मला अर्टसला जायचा होत. खूप काही करायचंय रे मला हे कॉमर्स नको होत. पण आई बाबा ऐकायलाच तयार नाहीत, त्यांचही एका अर्थी बरोबरच आहे म्हणा, बीकॉम केल्यावर नोकरी पटकन मिळते आणि शिवाय आम्ही दोघीही मुलीच सो पुढच्या खर्चाचा विचार करता त्यांनी त्याच्या बाजून विचार केला. पण मला नाही हे मनापासून कारावास वाटत. इतक एका श्वासात बोलल्यानंतर मात्र माझ्या मनाचा बांध फुटला प्रत्येकाचेच काही ना काही प्रॉब्लेम्स होते, आणि आम्हीच एकमेकांचे सोबती होतो.
खरंच कधी कधी आपले पालक आपल्या पातळीवर येऊन का नाही विचार करत! खरच अस झाल असता तर ...
"जाऊदे .. जर तर च्या गोष्टी झाल्या अग या! असुदे पण तुला अश्या कितीतरी गोष्टी या व्यतिरिक्तही करता येतील कि म्हणजे इव्हेंट्स लेखन आणि स्पर्धा ही हा फक्त तुला घरी न सांगता करावं लागेल हे खरं ",स्पृहा
ते तर आहेच ; आता आपण आपल्या शाखा तर बदलु शकत नाही ; पण आहे त्यातून काहीतरी वेगळं एकमेकांच्या मदतीनं नक्कीच करू शकतो. ठरल तर मग आपल्या आनंदाचे मार्ग आपणच शोधायचे ! अस म्हणून नव्या उमेदीने मन जागा झाल.एक खूप चांगला संकल्प करून आम्ही सगळे कॉलेज च्या बाहेर पडलो .आजचा रस्ताही तोच होता झाडंही तीच वर्दळ हि नेहेमीचीच पण आज सगळंच कसा वेगळा आणि मोकळ वाटत होत.घर कधी आल ते कळलंच नाही. आई दारात वाट पाहतच उभी होती ."काय ग किती उशीर? लवकर यावा,आज तुझ्या आवडीची मस्त खीर केलीय जा लवकर हात पाय धूऊन घे ..."
अरे वा ! ,मी.
"काही नाही ग असाच आज  सगळे जण भेटलो मग गप्पा झाल्या तुला माहितेय का ....",मी.
माझी अखंड बडबड पुन्हा चालू झालेली पाहून आईला आज खूप बार वाटलं. इतके दिवस शांत असणारी मुलगी आज आईशी खूप मनमोकळेपणाने बोलत होती. आईच्या डोळ्यात दोन क्षण पाणी आलं आणि ती तशीच माझ्याकडे पाहत  उभी राहिली ;कारण आज तिला तिची मुलगी खऱ्या अर्थाने परत मिळाल्यासारखी होती.

गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

"मन की बात !"

    आजचा दिवस तसा कंटाळवाणाच गेला. मी आणि माझी मैत्रिण माधवी माटुंग्यात माहेश्वरी उद्यानात सहज  फेरफटका मारून येऊ म्हणून जात असतानाच वाटेत आम्हाला एक मसाला पापडची गाडी लावलेली दिसली. आम्ही दोघींही एकमेकींकडे पाहात पापड घ्यायचा विचार करत होतो.तो मसाला पापड विकणारा भैयाही नुकतीच स्वत:ची गाडी लावूनं सेटलं होत असावा.अजून पर्यंत एकही गिऱ्हाईक आलं नव्हतं कदाचीत;कारण पहिला बोवनीचा पापड तसाच भाजून ठेवला होता.
भैया दो मसाला पापड देना....एक पार्सल और एक खाने के लिए...मी वेळ न दवडता पटकन सांगितल.
हा ..तो ये लो!”
भैया वो नही!” , मी
अभी तो किया है..
नही नया बनाओ ना!”
       त्याचाही धंदा होता. तोही काही न बोलता आता मसाला पापड करण्यात व्यस्त झाला. त्याच्या सोबत असणारे त्याचे काका त्याला मदत करत होते. खूप वयस्कर नसावा तो मुलगा! आमच्या पेक्षा २ वर्षांनी मोठा असेल कदाचीत; पण बोलणं वागणं खूप आदबीच होतं. आम्ही उभे होतो त्या पलिकडच्या बाजूला बऱ्याच डिश पडल्या होत्या आणि त्या काकांनी त्या मुलाला उचलून कचरापेटीत टाकायला सांगितल्या. ‘स्वच्छ भारत’, ‘स्वच्छ सडकं’,हा सगळा प्रकार पूर्ण होईपर्यंत आम्ही पार्सल घेऊन, पैसे देऊन निघालो खरे ; पण त्यानंतर तो प्रसंग आमच्या डोक्यात घोळत होता.यावर आमच्यात सहज म्हणता म्हणता एक छान आणि वेगळीच चर्चा रंगली.
     “बघ ना! सगळीकडे स्वच्छ भारत मोहीम सुरू आहे; पण हे शेवटी त्या मुलाला का सांगावं लागलं की तो कचरा उचलून त्या कचरा पेटीत टाक...
हे तो स्वत: ही करू शकला असता ना! ,माधवी.
अगं आपण असं स्वत:हून करायची इच्छा असती तर खूप गोष्टी झाल्याच असत्या की,मी
म्हणजे? माधवीन मध्येच विचारलं
म्हणजे, आपल ना अस असतं की आपल्या मागे किंवा डोक्यावर कोणाचा तरी वचकं, दरारा लागतो,तो असला की सगळ कस निट होतं, नाहीतर बिनबोभाट असतं नाही..!
बघ ,आज स्वत:सोबत भारताला स्वच्छ ठेवा हे शाळेपासुन शिकवल जात! तरी आजच्या सरकारला त्यावर मोहीम करावी लागते आणि त्यावर काम कराव लागत या सारखं मोठं दूर्देव नाही. इथे फक्त स्वत:सोबत भारताला स्वच्छ ठेवा ह्या बरोबरच ना मन की बात मध्ये मनालाही स्वच्छ ठेवा ही योजना ही असायला हवी होती. मग कदाचीत बदल घडावा असं तरी वाटलं असतं सगळ्यांना.
 तिला माझ्या या निरागस बोलण्याची किवं आली की हसू, हेच मला समजायला दोन सेकंद गेले.
खरंच आहे ना आधी आपली मन आणि डोकी स्वच्छ करायला हवीत तर बाकी गोष्टी स्वच्छ होतीलं.
    शेवटी मनातली तुसडेपणाची,कुटीरतेची भावना तोकडी मनोवृत्तीची जळमट म्हणजे आपल्याला आरक्षण नको असतं फक्त बोलायला पण फायदाच असेलं तर हवं! जाता जात नाही ती जात संस्था नको आणि अंतरजिय विवाहही नकोत.स्रीयांचे प्रश्न आणि पुरुष प्रधान यावर वादविवाद करण्याआधी दोन्ही बाजूच्या चूका समजून घ्यायला नकोत.इथे लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत पण आम्हाला याची जाणीव ही नको आणि माणूसकीचे धडे देणारा माणूस हा कार्यकररता नेता नको. तर डोक्यातल्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे आणि नको त्या अस्मितांचे किडे जेव्हा स्वच्छ होतील तेव्हाच खरं त्या स्वच्छ भारतअभियानाला अधिक श्रेय द्याव लागेल.. या पेक्षा खूप वेगळे आणि गरजेचे प्रश्न आजही आहेत आपल्याकडे पण आपल्या मनावरच्या आणि डोळ्यावरच्या जळमटाच काय? प्रत्येक गोष्टीला अर्थातच हा विचार खूप आयडीयल हे माहित आहे ; आपण स्वत:हून यातलं २ टक्के जरी बदललं ना तरी खूप आहे. का माहीत आहे ! कारण आधी सवय लागायला हवी ती स्वशिस्तीची नेहमीच कोणाच्यातरी भीतीपोटी किंवा दबावाखाली कामं करणाऱ्या माणसाचं भवितव्य कधी उजळत् नाही आणि पर्यायानं देशाचही नाही. हो ना ?

शनिवार, ७ मे, २०१६

अस असाव स्मार्ट काॅलेज

काॅलेज हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा अन् आपुलकीचा विषय असतो.काॅलेजमधील दिवस आणि कॉलेजात केलेली मस्ती प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देतं; परंतु या सगळ्याबरोबरच सध्याच काॅलेज एकंदर शिक्षण पद्धती पहाता कुठेतरी व्यावसायाच्या करियरच्या ठिकाणी आपण कमी पडतो आणि मग असं नकळतं किंवा असे उद्गार येतात,अरेरे! काॅलेजमध्ये करायला हवं होत अरे हे शिकवलच नाही!
        मुळात आपण कितीही म्हटलं की आपल्या आयुष्याचा पाया शाळेत घातला जातो,त्यापेक्षा अधिक पट तो काॅलेजमध्ये होत असतो.आपल्या कलागुणांना कुशलतेला योग्य आणि मुक्त व्यासपीठ काॅलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळतं: परंतु असं म्हणतात की हिरा घडवण्यासाठी त्याला आधी पैलू पाडावे लागतात ते काम कळत नकळत काॅलेजमध्ये होत असतं आणि असं कुशल ज्ञानरूपी हिरे तयार करण्यासाठी स्मार्ट काॅलेज अगदी योग्य आहे अस मला वाटतं.
     स्मार्ट काॅलेज म्हणजे नुसत इन्फास्ट्रकचर स्मार्ट चकचकीत केलम असं नाही तर विद्यार्थ्यांच्या कलेला आणि ज्ञानाला योग्य ती संधी योग्य मार्गदर्शन आणि योग्य व्यासपीठ असा त्रिवेणी संगम मिळावा. या बरोबरच व्यावहारिक तात्विक आणि चौकटी पलिकडचा विचार तरण्याची क्षमता आणि बुद्धीमत्ता वाढीस लागण्यासाठी विविध उपक्रमांचे अथवा कार्यक्रमांचे आयोजन करावे. यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही विशेष कार्यशाळा कार्यक्रम करावेत.याच जोडीला प्रत्येक परीक्षांनंतर त्या त्या डिपार्टमेंट अथवा संबंधीत शाखांशी प्राचार्यांनी संवाद साधावा व यात विद्यार्थांना चांगल्या वाटचालीसाठी आणि प्रगतीसाठी शुभेच्छा द्याव्यात.
या शिवाय काॅलेजमध्ये कॅंपस मुलाखती online exam e-learning यांची सोय असावी.
विद्यार्थांना तंत्रज्ञानाचा आणि छापिल पुस्तकाचा अभ्यास दोन्ही असावा. या व्यतीरिक्त presentation projects हे soft copy वर असावेत. प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र संगणक कक्ष किमान ३ संगणक आणि स्वतंत्र छोटे पुस्तक संग्रह असावं. आठवड्यातला एक दिवस विद्यार्थांसाठी वाचन कट्टा अथवा talk show  चर्चासत्र असावे, यासाठी स्वतंत्र खोली असावी.
        Admission पासून रिझल्ट पर्यत ची व्यवस्था ही ऑनलाईन पद्धतीची असावी, त्याच प्रमाणे तृतीय वर्षातील विद्यार्थांनसाठी काही काऊंसिल कार्यशाळा असाव्यात, ज्यामध्ये त्यांच्या भवितव्याबद्दल आणि पुढील आयुष्याच्या एकंदर वाटचालीसाठी तसेच अभ्यासाला पुरक असे मार्गदर्शन असावे. याच बरोबर विद्यार्थी हे महाविद्यालयाचे सदैव ऋणी आहेत.त्यांनी काॅलेजमधील प्रत्येक अगदी वर्ग लाईट फळा इथपासून ते शिकक्षकांपर्यंत सर्वांचा योग्य आदर आणि योग्य तो उपयोग केला पाहिजे. काॅलेजने ज्या ज्या संधी दिल्या त्याचा योग्य आणि पुरेपूर फायदा विद्यार्थांनी करून घेतला पाहिजे. स्मार्ट काॅलेज तेव्हाच होईल जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध हे सलोख्याचे आणि आदराचे असतील यासाठी दोन्ही बाजून प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. तरच आपलं कॉलेज स्मार्ट कॉलेज होईल यात शंकाच नाही. असं मला वाटतं.

  -क्रांती