मेगाब्लॉक, जम्बोब्लॉक कशासाठी? कोणासाठी?
'रोड मरे त्याला कोण रडे' असं म्हणत आपण नेहमीच रेल्वे प्रशासनाला आणि सेवेला नाव ठेवत असतो. दर रविवारी मेगाब्लॉक घेऊन लोकल उशिरा होतात कश्या? लोकल रुळावरून घसरतेच कशी? असा प्रश्न देखील आपण वारंवार करतो. मात्र खाली दिलेल्या या छायाचित्राकडे जरा पाहा...
प्रत्येक रविवारी हे रेल्वे कामगार भर उन्हात काम करत असतात. भर उन्हात फक्त हेच कामगार काम करतात असं मुळीच नाही. मात्र रेल्वे सेवा सुरळीत रहावी. प्रवाशांना वेळेत पोहोचता यावं यासाठी हे रेल्वे कामगार काम करत असतात.
आता राहिला प्रश्न होता रेल्वेच्या सेवेचा. बऱ्याचदा लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला पहिलं प्राधान्य दिल्यामुळे रेल्वे उशिरानं धावतात. तर काही वेळा क्रॉसिंग करताना रेल्वे रुळावरून डब्बे घसरतात. दोन्ही रेल्वे रुळांमधील क्रॉसिंग करतानाचे अंतर आणि दिवसा उष्ण आणि रात्री दमट तापमानामुळे रेल्वे रुळ हे आकुंचन पावतात. त्यामुळे रेल्वे रुळाला तडे जातात. अशा अनेक कारणांमुळे मध्य असो अथवा पश्चिम किंवा हार्बर मार्गावर रेल्वे सेवा उशिरानं असतात.
प्लॅटफॉर्मवर लोकल उशिरा येत असल्याचं कळताच ही लोक दर रविवारी कसलं काम करतात, असा चिडखोर प्रश्न स्वत:लाच विचारतो. पण मुळात आपण जो काही प्रवास करतो तो याच रेल्वे कामगारांमुळे करतो. मग दोष तरी कुणाचा? तर दोष आहे तो त्या बड्या अधिकाऱ्यांचा जो लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला आधी हिरवा सिंग्नल देतात आणि नंतर मुंबईकरांना. मेगाब्लॉकच्या दिवशी हा कामगार योग्य ते काम करतो. मात्र मेहनत घेऊनही आपण या रेल्वेसेवेची धुरा असणाऱ्या अधिकाऱ्याला दोष न देता या रेल्वे कामगाराला देतो.
'रोड मरे त्याला कोण रडे' असं म्हणत आपण नेहमीच रेल्वे प्रशासनाला आणि सेवेला नाव ठेवत असतो. दर रविवारी मेगाब्लॉक घेऊन लोकल उशिरा होतात कश्या? लोकल रुळावरून घसरतेच कशी? असा प्रश्न देखील आपण वारंवार करतो. मात्र खाली दिलेल्या या छायाचित्राकडे जरा पाहा...
प्रत्येक रविवारी हे रेल्वे कामगार भर उन्हात काम करत असतात. भर उन्हात फक्त हेच कामगार काम करतात असं मुळीच नाही. मात्र रेल्वे सेवा सुरळीत रहावी. प्रवाशांना वेळेत पोहोचता यावं यासाठी हे रेल्वे कामगार काम करत असतात.
आता राहिला प्रश्न होता रेल्वेच्या सेवेचा. बऱ्याचदा लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला पहिलं प्राधान्य दिल्यामुळे रेल्वे उशिरानं धावतात. तर काही वेळा क्रॉसिंग करताना रेल्वे रुळावरून डब्बे घसरतात. दोन्ही रेल्वे रुळांमधील क्रॉसिंग करतानाचे अंतर आणि दिवसा उष्ण आणि रात्री दमट तापमानामुळे रेल्वे रुळ हे आकुंचन पावतात. त्यामुळे रेल्वे रुळाला तडे जातात. अशा अनेक कारणांमुळे मध्य असो अथवा पश्चिम किंवा हार्बर मार्गावर रेल्वे सेवा उशिरानं असतात.
प्लॅटफॉर्मवर लोकल उशिरा येत असल्याचं कळताच ही लोक दर रविवारी कसलं काम करतात, असा चिडखोर प्रश्न स्वत:लाच विचारतो. पण मुळात आपण जो काही प्रवास करतो तो याच रेल्वे कामगारांमुळे करतो. मग दोष तरी कुणाचा? तर दोष आहे तो त्या बड्या अधिकाऱ्यांचा जो लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला आधी हिरवा सिंग्नल देतात आणि नंतर मुंबईकरांना. मेगाब्लॉकच्या दिवशी हा कामगार योग्य ते काम करतो. मात्र मेहनत घेऊनही आपण या रेल्वेसेवेची धुरा असणाऱ्या अधिकाऱ्याला दोष न देता या रेल्वे कामगाराला देतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा