रविवार, ९ जुलै, २०१७

गुरूदक्षिणा...

  आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा...गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस...यानिमित्तानं राज्याच्य विविध भागांमध्ये उत्सव सुरू आहे.गुरूला आपल्या जीवनाच्या जडण घडणीत अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या जीवनाला घडवणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस...आई,शिक्षक,मित्रमैत्रीणी,ऑफिसचे सोबती बॉस आणि अर्थातच देव किंवा मठातील साधू हे तर प्रत्येकाच्या आयुष्यातले गुरू असतात. पण त्या व्यतिरीक्त आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या-छोट्या सजीव निर्जीव गोष्टी आहेत ज्या कळत नकळत गुरूंसारखचं आपल्याला सातत्यानं मार्गदर्शन करत राहतात...
      अनुभव हा माणसाचा सगळ्यात बलवत्तर आणि मोठा गुरू म्हणायला हरकत नाही. अनुभवातून आपण शिकतो दुसऱ्याला शिकवतो आणि घडत जातो. पण काही म्हणा...आपल्याला जितक्या उंचीवर हे अनुभव नेऊन ठेवतात त्या पेक्षा १० पट आपले पाय जमिनीवर आणण्याला जबाबदार हा आपलाचं अनुभव असतो,नाही का?
    निसर्ग...तुम्ही निसर्ग नियमाच्या विरूद्ध गेलात तर निसर्गही तुम्हाला त्या पद्धतीनं त्याचं रुप उलगडून दाखवत आणि या निसर्गाकडून ही बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेतचं की ओ...फुलाकडून प्रसन्नता,ताजेपणा,हवे कडून भेदभाव न करण्याची दृष्टी,सागराची विशालता सामर्थ्य,रागात असणार रौद्र रूप,पक्षांची गगनभरारी आणि ऊन सावलीच्या खेळात रंगणारी लपाछपी. या सगळ्याच गोष्टी प्रत्येक लेखकाच्या फिलॉसॉफीत असतातचं की...आणि प्रत्यक्षातही..फक्त आपली अनुमान शक्ती आणि निरीक्षण क्षमता कमी पडते इतकचं...हे सगळचं खूप कॉमनं आहे पण तरी...
   आज गुरूपोर्णीमेच्या निमित्तनं आज मला स्वत:लाच एक छोटसं गिफ्ट घ्यावस वाटल का माहित आहे का..? आपण आपले सगळ्यात पहिले गुरू असतो असं मला वाटत...आरश्यासमोर एकदा स्वता: उभं राहूनं स्वता:ला आपण मार्गदर्शन करत असतो. आपल्या मनात आंतरंगात एक स्वता:चा अस्तीव टिकवण्यासाठी धडपड चालू असते. कुठेतरी आपणचं आपल्याला आतून सतत दिशा दाखवत असतो...मार्गदर्शन अर्थातच घोतो आपण... पण ते जे स्वत:चं वेगळेपण टिकवण्यासाठी आपण धडपडत असतो ना... नला असं वाटत की माझं अंतरमन हा माझा गुरू आहे...कारण प्रत्येक अडल्या प्रसंगावर डोळे बंद करून स्वता: च्या मनाला विचारते त्या अंतरमनाचा आवाज ऐकते..मला मिळणारं उत्तर आणि त्याचे रिझल्टल्स हे जवळपास सारखे असतात...उदा.मी एखादी गोष्ट करतेय आणि मला माहित आहे की ज्यामुळे आज मी माझ्या यशाची पहिली पायरी चढू शकले आणि ही खरी गुरूदक्षिणा आहे माझ्यासाठी आणि माझ्या सगळ्या गुरूंसाठी नाही का...?

शनिवार, २० मे, २०१७

संधी

      नुकतच कॉलेज संपलं.आता पुढे काय हा मोठा प्रश्नच होता.मास्टर्स करायच तर काय विचारता फी जास्त आणि जागा कमी अशी गत मुळी !विचार तर केला होता मास्टर्स चा फोर्म भरायचा पण आरक्षणाच्या गर्दीत जागा उरल्या तर अॅडमिशन मग त्यासोबत साईडबाय साईड सहज जॉबसाठी प्रयत्न करून बघूया अस सहज मनात आल व CV सगळीकडे द्यायला सुरूवात केली.कल्पना नसतानाही अचानक सगळीकडे CV शॉर्टलीस्ट झाला.मुलाखतीसाठी फोन आले.एक एक करत सगळीकडे मुलाखती दिल्या मात्र त्यानंतर कित्येक दिवस प्रतिसाद आलाच नाही.हताश आणि निराश झालेल्या मनात अनेक विचार येऊन गेले.मात्र आई आणि माझा मित्र प्रणित यांनी नेहेमी माझ्या मनात होप्स जागे ठेवण्याच काम कऴत न कळत केलं.
        "तू हुशार आहेस मेहेनती आहेस, तू करू सकतेस अगं! कुठेही नाही मिळाल आता तरी हार नको मानूस पुन्हा छान तयारी कर आणि तुला मिळेल अगं का इतक टोन्सन घेतेस !या वाक्यांनं थोडा धीर यायचा. एक दिवस असचं अचानकपणे एका दिवशी सलग काही मिनीटांच्या अंतराने तीन फोन आले.एक फोन साप्ताहिकातून एक वृत्तपत्रातून आणि एक चॅनल मधून! आता मोठा झोल होता कुठे जाऊ अस झाला होतं.साप्ताहिक आणि वृत्तपत्रात मी या पूर्वी कोणतेच काम केले नसल्याने तिथं कितपत जमेल आणि त्या वातावरणात आपण सर्वाइव करू शकू का याचा विचार करून थोडी ती संधी होल्डवर टाकली आणि चॅनलला जायच अस ठरलं.अजून 5 राऊंड बाकी होते.वृत्तपत्रचे सगळे राऊंड देऊन सिलेक्शन झाल होतं.पण चॅमलच्या प्रत्येक राऊंड नंतर एक वेगळीच भीती होती.
         मात्र  अचानक शेवटचा राऊंड संपल्यावर हातात लेटर मिळालं.आणि पुन्हा ती वाक्य आठवली.या आधी मी केलेल्या अभ्यासाचा आणि एंटर्नशीपच फळच असाव हे.आता मन लावून फक्त काम करायचं खूप शिकायच आणि मी माझ्या इंटरव्ह्यु मध्ये दिलेल्या उत्तराला प्रत्यक्षात साकार कारायच ही इच्छा बाळगून कामाला नव्यान सुरुवात झाली.इथले सगळेच सर आणि मॅम खूप छान समजून घेतात,शिकवतात,ओरडले तरी समजूून सांगतात.इथलं वातावरण खेळीमेळीच आहेच पण तिकतच जबाबदारीचही आहे.त्यामुळे माझी सुरूवात चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही.
विशेष वाटत ते एका गोष्टीच देेव देतो ते भरभरून तस मला संधी आली तेव्हा निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं.ही माझ्या यशाची पहिली पायरी आहे.

सोमवार, ८ मे, २०१७

बाहुबली 2


बाहुबली 2 हा चित्रपट पाहायचा हे अचानकच ठरलं.कोणत्याही वृत्तपत्राचा किंवा दुरचित्रवाणीवरचे चित्रपटबद्दलचे परीक्षण समीक्षण तथाकथित मते मी या आधी वाचलेली नाहीत.त्यामुळे मी ह्या चित्रपटाबद्दल जे मला वाटलं त्यात कोणताही पूर्वग्रहाचा समावेश नसावा कारण हा चित्रपट पाहायचा की नाही हे फार विचार केलेले नव्हते, मात्र येणाऱ्या जोक्स आणि मेसेजमूळे अर्थात त्याची महात्वाकांश आणि उत्सुकता वाढली आणि म्हणून तो चित्रपट पाहून त्यावर आज काहीतरी लिहावेसे वाटले ते यासाठीच.
   एका बाजूला राजाची कर्तव्य तत्व आणि दुसऱ्या बाजूला धर्म आणि वचनाचे पालन या दोन गोष्टीत सांभाळून आणि समजून त्या अमलात आणणे.एक उत्तम राजाचे वैशिष्ट्य कर्तव्य आणि प्रजेप्रति असणारी आस्था आदर आणि त्यांचे रक्षण करणे माता आणि मातृभूमी (अर्थात प्रजा आणि राज्य)यांचा सन्मान आणि पालन याचे उत्तम धडे देणारी राजमाता आणि तिचा पुत्र बाहुबली अशी उत्तम कथा गुंफली आहे.चित्रपटात प्रेम कथा आणि शेवटी नेहेमी हेरॉचा विजय हे ठरलेले गणित असतेच.पण त्या पलीकडे जाऊन विचार केला तर या चित्रपटातील अनेक गोष्टी आजच्या काळाशी संलग्न होताना जणवतातच की! परायोसे ज्यादा अपनोंके घाव चुंबते है त्या type मध्ये अंतर्गत असणार राजकारण आणि त्यात जाणारा सत्याचा बळी आणि इतकं सगळं घडून शेवटी वाईट प्रवृत्तीच्या पापाचा घडा भरला की त्याचा नाश होतोच.अशी एकूणच एका वाक्यात सांगून जाणारी कथा मात्र त्यात रंगवलेली पात्र आणि सेट हा काल्पनिक असला तरी त्यातील असणाऱ्या स्वभावाच्या प्रवृत्ती या आजही पाहायला मिळतात.
   या पलीकडे सिनेमॅटोग्राफी आणि ग्राफिक्स चा उत्तम वापर केला आहे.या चित्रपटात उभे केलेले सेट आणि काही दृश्या ही स्वप्नवत वाटणारी असली तरीही ती काही क्षण खरी भासून जातात मनाला भुरळ पडतात. प्रेमकथा आणि त्यात येणारे अडथळे त्यावर घेतलेला निर्णय हा किती योग्य आहे हे पटवून देणारे डायलॉग्स!
     गाणी आणि संगीतही कुठेच फारसे रटाळ वाटले नाही.खर या सिनेमाचे बिग बजेट का आहे ते सिनेमा पाहिल्यानंतर जाणवते.कुठेच राटाळपणा वाटला नाही.इंटरवल पर्यंत उत्सुकता कायम राहते.बाकी चित्रपट जरूर पहा कारण कटप्पाने बहुबलीला का मारले यासाठी नाही तर एका चुकीच्या निर्णयात किती ताकद असते हे अजमावण्यासाठी.एका गैरसमजातून किती राजकारण केल जात आणि अर्थातच या बिग बजेट चा एक भाग म्हणून त्यातील स्वप्नवत सेट आणि दृश्य पाहण्यासाठी.
-क्रांती
   

शनिवार, १ एप्रिल, २०१७

अभ्यासाचे तंत्र

अभ्यास करायचा म्हटलं की सगळ्याच्या डोक्याला आठया पडतात.अभ्यास म्हटलं की पोटात गोळा येतो आणि परीक्षेच्या वेळी मात्र कधीही न बोलणाऱ्या किंवा आपण ज्यांच्यावर सतत जळत असतो त्या आपल्याच वर्गातल्या मित्र मैत्रिणींची मदत कशी घ्याची आणि मग त्यासाठी वापरले जाणारे फंडे आठवतात.अभ्यास म्हटलं की येत ते टेंशन आणि नको वाटत त्या परीक्षा;त्याच अभ्यासासाठी काही सोपे आणि मजेशीर फंडे आज मी सांगणार आहे. हे  सगळे फंडे मी स्वतः माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी वापरलेले आहेत. फक्त एक आहे या सगळया फंडयांचा वापर केला तर फायदा नक्की होतो मात्र त्यासाठी नियमित काम करायला हवं आणि थोडा वेळ हि द्यायला हवा.
फंडा 1
SQ4R study
S -survey
Q- questions
R -read
R -react
R -remind
R -rewrite
याशिवाय
पॉकेट डिक्शनरी ज्यात आपण वेगवेगळ्या चिन्हाचा वापर करून किंवा आकृत्यांचा वापर करून उत्तर शॉर्ट मध्ये लिहून ठेवावं.उदा ट्री डायग्राम चा किंवा वेगवेगळ्या डायग्राम चा वापर करावा.या शिवाय आपण जे वाचतो त्याची नोंद कुठेतरी संदर्भासाठी करून ठेवावी.शक्य तेवढे पुन्हा पुन्हा आठवून लिहून काढण्याचा प्रयत्न करावा.फॉर्मुले किंवा समीकरण लक्षात ठेवण्यासाठी वेग वेगळी वाक्य कविता तयार कराव्यात.कोडी खेळ तयार करावेत ज्यामुळे ते सहज लक्षात राहतील.या शिवाय वर्गात शिकवल्या जाणाऱ्या लेक्चर च्या रनिंग नोट्स काढाव्यात.या शिवाय शक्य असल्यास ग्रुप स्टडी करावा त्या मध्ये एखाद्या विषयाला धरून चर्चा केली जावी त्याच बरोबर जो विषय कळला नाही तो ग्रुप मधल्या एकां समजावून द्यावा त्यावर प्रश्न आणि उताराच्या चर्चा कराव्यात जास्त उदा वापर करून ती चर्चा मुद्याला धरून असावी त्यातील महत्वाच्या नोट्स काढाव्यात. सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा केलेला भाग वाचाव व दिवसातून कमीत कमी 3 वेळा तो आठवतो का याचा प्रयत्न करावा. शक्यतो शांततेच्या वेळेत व फ्रेश असताना वाचन करावे. सकाळी किंवा एकदम रात्री आणि बाकी वेळी त्यावर विवेचन चर्चा रिमाईंड लेखन याचा वापर करावा.
सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेछा ...

गुरुवार, ३० मार्च, २०१७

ड्रोन पत्रकारिता

डायरी, टेप रेकॉर्डर, कॅमेरा अशा गोष्टींचा समावेश या आधी पत्रकारितेत पाहायला मिळाला. मात्र या पारंपरिक प्रतिमे नजिकच्या वर्षात अनेक बदल घडलेत. इलेट्रॉनिक मीडियामध्ये ओबी, लाईव्ह यू सारख्या गोष्टींनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला समावेश करून घेतला. सध्याच्या पत्रकारितेमध्ये मोबाईल आणि ड्रोनने आपलं प्रभूत्व प्रस्तापित केलं असं म्हणनं वावगं ठरणार नाही.
    मुळात ड्रोन पत्रकारितेमधला ड्रोन हा आहे तरी काय? तर ड्रोन हा एक असा कॅमेरा आहे जो रिमोटच्या सहाय्यानं हवेत उडत असतो. हे एक छोटसं गॅजेट असतं जे विमानासारखं आकाशात उडतं आणि पत्रकारितेमध्ये महत्त्वाचे जे व्हिजुअल्स असतात. त्या व्हिजुअल्सचे एरिअल शॉटच्या म्हणजेच उंचावरून शॉट्स घेण्याचे काम ड्रोन कॅमेरा करत असतो.

 महाराष्ट्रात ड्रोनचा सर्वाधिक उपयोग हा मराठा मूक मोर्चाच्या वेळी झाला. राज्यात ठिक-ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा मकू मोर्चा काढण्यात आले. यावेळी लाखोंच्या संख्येने जमा झालेल्या लोकांचे दृश्यं टिपण्यासाठी या ड्रोन कॅमेऱ्याचा मोलाचा वाटा होता.
      सध्या तरी ड्रोनचा वापर अशाच काही प्रसंगाच्या वेळी होतो. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईत काही काळासाठी ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोणता उत्सव असो किंवा अशा जागी जिथे सहज जाणं शक्य नाही त्या ठिकाणी ड्रोनच्या आधारे व्हिजवल्स घेता येऊ शकतात आणि आता मोबाईलद्वारे जशी पत्रकारिता होते तशीच भविष्यात ड्रोनमुळे पत्रकारिता करता येईल.

बुधवार, २९ मार्च, २०१७

नटापासून अभिनेत्यापर्यंत...

(काल आमच्या भेटीचा पहिल्यांदाच योग आला.ज्यांना आपण गेले काही दिवस मालिकांमधून आणि या आधी सिनेमा व अभिजात नाटकाच्या माध्यमातून पाहात होते त्यांना आज भेटायची संधी मिळाली.का कोण जाणे पण आता पर्यंत अनेक व्यक्तींना कलाकारांना भेटण्याचा योग्य आला, पण यांच्याशी भेटून गप्पा रंगण्यात जी मजा होती ती काही वेगळीच होती.ज्याला आपण म्हणतॊ ना, नजर आकाशात आणि पाय जमिनीवर अगदी तसाच व्यक्तिमत्व असणारा हा कलाकार! अगदी नटा पासून अभिनेत्यापर्यंत विविध भूमिका साकारणारे श्रीराम कोल्हाटकर.)
    माझ्या एकूणच कारकिर्दीला सुरुवात ही शालेय जीवनापासून झाली.प्रेक्षकांमध्ये नुसत बसून राहण्यापेक्षा नेहेमी समोर जे चालू आहे त्या गोष्टीचा एक आपण भाग व्हावं, हि ईर्षा काही स्वस्त बसू देईना आणि मग राज्यनाट्य स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धा तिथून जी सुरुवात झाली ती अगदी महाविद्यालायपासून ते आतापर्यंत.मला सुरुवातीला कॅरेमऱ्याची खूप आवड होती आणि त्यातही नवीन काहीतरी करायची मग मी वेग वेगळे शो करायचो. कॅमेऱ्यातील सगळं तंत्र शिकून घेतलं,पण नंतर काही कारणाने या सगळ्या माझ्या क्रिएटीव्हीटीवर पाणी पसरलं.त्याला काही पर्सनल कारणही तिकीच जबाबदार होती.पण मला याच क्षेत्रात स्वतःच एक स्थान निर्माण करायचा होत आणि त्या जोडीला पोटापाण्यासाठी पैसे कामावनाही गरजेचं होतं.घरच्यांची म्हणावी तितकी साथ नसल्यानं आता पुढची वाटचाल एकट्यानं कारण भाग होत.पुढे मला दिलीपच्या ओळखीने एका नाटकासाठी छोटा रोल मिळाला. तो रोल छोटा होत्या त्यापेक्षा जास्त त्या नाटकात मला विक्रम गोखलेंसोबत काम करायला मिळणार याचा आनंद जास्त होता.त्या एका नातकातच आमची ओळख खूप चांगली झाली आणि त्या नंतरची बरीच नाटके हि मला त्यांच्यासोबत करायला मिळाली हे माझं भाग्य होतं.मी सिरीयल केल्या चित्रपट केले पण आजही मला ती अभिजात नाटक जास्त भावतात आवडतात, त्यात जास्त काम करायला आवडत.कसा असत ना तुम्ही सिनेमा करा किंवा सेरीयल आपण त्या चॅनेल च्या हातातले भावले असतो पण नटाला मात्र नाटकातील पात्रच आणि कथेला अनुसरून अभिनय करण्याची मुभा असते.तुम्ही खूप पात्र जगता फुलवता आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांच एक वेगळे पण निर्माण करता.याच उदा द्यायचं तर विक्रम गोखलेंच बॅरीस्टर नाटक त्यात त्यांनी जी भूमिका रंगवलीय ती आजही तशीच डोळ्यासमोर उभी राहते.
एकूणच साध्याच एकंदर हे पाहता सगळंच कुठेतरी मागे पडतंय असं वाटत आहे.आजही माझ्या घरी TV  नाही कारण आज आपल्याला विचार करायलाच नको आहे,फक्त त्या खोक्या समोर बसून स्वतःच मनोरंजन करायचं बिनबोभाट ; त्या पलीकडे आज मुलांना वाचायला आवडत नाही. चांगल्या गोष्टी या तेवढ्या पुरत्याच राहतात, खर तर मला तुमच्यासारख्या नव तरुणांशी मैत्री करायला आणि गप्पा मारायला खूप आवडतं त्यांच्यात काहीतरी करण्याची धमक असते ताकद असते ऊर्जा असते आणि तीच मलाही मिळत असते.फक्त दुःख याच वाट की त्यांना सगळ्या गोष्टी झटपट हव्या असतात माहिती नुसती नको असते वाचन नको असत पण तेच विझुवल गोष्टी खूप पटकन एक्ससेप्ट करता.याला कारण ही जनरेशम गॅपच आहे. पण तितकीच उत्तम विचार आणि नवनिर्मितीची ताकद आहे.फक्त याला चांगल्या वाचनाची योग्य जोड द्यावी आणि जास्त आव्हानात्मकपणे सद्याच्या गोष्टी मांडल्या जाव्यात; त्याची सुरुवात झाली आहे असा म्हणायला हरकत नाही.
शब्दांकन - क्रांती कानेटकर

भर उन्हात काम...मगार

मेगाब्लॉक, जम्बोब्लॉक कशासाठी? कोणासाठी?
'रोड मरे त्याला कोण रडे' असं म्हणत आपण नेहमीच रेल्वे प्रशासनाला आणि सेवेला नाव ठेवत असतो. दर रविवारी मेगाब्लॉक घेऊन लोकल उशिरा होतात कश्या? लोकल रुळावरून घसरतेच कशी? असा प्रश्न देखील आपण वारंवार करतो. मात्र खाली दिलेल्या या छायाचित्राकडे जरा पाहा...

प्रत्येक रविवारी हे रेल्वे कामगार भर उन्हात काम करत असतात. भर उन्हात फक्त हेच कामगार काम करतात असं मुळीच नाही. मात्र रेल्वे सेवा सुरळीत रहावी. प्रवाशांना वेळेत पोहोचता यावं यासाठी हे रेल्वे कामगार काम करत असतात.
      आता राहिला प्रश्न होता रेल्वेच्या सेवेचा. बऱ्याचदा लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला पहिलं प्राधान्य दिल्यामुळे रेल्वे उशिरानं धावतात. तर काही वेळा क्रॉसिंग करताना रेल्वे रुळावरून डब्बे घसरतात. दोन्ही रेल्वे रुळांमधील क्रॉसिंग करतानाचे अंतर आणि दिवसा उष्ण आणि रात्री दमट तापमानामुळे रेल्वे रुळ हे आकुंचन पावतात. त्यामुळे रेल्वे रुळाला तडे जातात. अशा अनेक कारणांमुळे मध्य असो अथवा पश्चिम किंवा हार्बर मार्गावर रेल्वे सेवा उशिरानं असतात.
     प्लॅटफॉर्मवर लोकल उशिरा येत असल्याचं कळताच ही लोक दर रविवारी कसलं काम करतात, असा चिडखोर प्रश्न स्वत:लाच विचारतो. पण मुळात आपण जो काही प्रवास करतो तो याच रेल्वे कामगारांमुळे करतो. मग दोष तरी कुणाचा? तर दोष आहे तो त्या बड्या अधिकाऱ्यांचा जो लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला आधी हिरवा सिंग्नल देतात आणि नंतर मुंबईकरांना. मेगाब्लॉकच्या दिवशी हा कामगार योग्य ते काम करतो. मात्र मेहनत घेऊनही आपण या रेल्वेसेवेची धुरा असणाऱ्या अधिकाऱ्याला दोष न देता या रेल्वे कामगाराला देतो.

बाळकडू

      मुंबई... स्वांतत्र्यानंतर या मुंबईवर अनेकांनी आपला हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला. मुंबई सोन्याचं अंड देणारी मुंबई! कधी ही न थांबणारी मुंबई! मात्र इथेच जन्मलेल्या मराठी माणसाला या मुंबईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला. इथे राहणाऱ्या भूमिपुत्रावर होणारा अन्याय हा दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी सर्व सामन्यांचे डोळे उघडण्या आधीच पाहिला होता. या मराठी माणसासाठी... मराठी अस्मितेसाठी 1965मध्ये उभी राहिली ती शिवसेना.
  पण मुद्दा हा एका राजकीय पक्षाचा नाही आहे... मुद्दा आहे तो बाळासाहेबांनी ओळखलेल्या आणि लक्षात आलेल्या मराठीच्या अस्थित्वाचा आहे.
    वादाची गोष्ट म्हणजे मराठी माणसाचे मुंबईमध्ये असलेलं अस्तित्व, पहिल्यासारखचं आहे का? प्रश्न आहे मराठीचा, मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा. गेले कित्येत वर्षांपासून मराठी माणूस हा मुंबईमधून बाहेर फेकला गेला आहे. जागेच्या अभावामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे, तर कधी येणा-या लोंढ्यांमुळे मराठी माणूस हा बाहेरचं फेकला गेला आहे.
    पण मराठी माणूस का फेकला गेला? तर खरं येथे असणाऱ्या गिरण्या-मिल्समालकांच्या कारस्थानावरून हथबल होऊन संप करून मराठी माणूस खचत चालेला. मोडेन पण वाकणार नाही, ही तर सुरूवात होती. पोटा-पाण्यासाठी आणि बायका-पोरांसाठी मुंबईत राहणारा मराठी माणूस हा आपले घरदार विकून नाईलाजाने मुंबईच्या बाहेर जात होता.
   कालांतराने इथल्या जागा गुजरात्यांनी, पंजाब्यांनी, मारवाड्यांनी बळकावल्या. मद्रासांनी हॉटेलस् काढले. तर गुजरात्यांनी शेअरबाजारात जोर धरला होता. प्रत्येकाने आपआपले उद्धोग चालू केले. आणि मराठी माणूस त्यांच्या हाताखाली काम करू लागला. आपल्याचं मातीतं दुसरा येऊन एखादा उद्दोग सुरू करतो आणि भूमिपूत्र त्याच्या हाताखाली काम करतो ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते. खर तरं आपल्या मराठी माणसाचे चुकले होते. आहे! त्याला उद्योग करता आला नाही. म्हणून तो चाकरमानीचं राहिला.
     बाळासाहेबांनी ह्या माणसाला झोपेतून जागं केलं आणि बाळकडू नावाचे शस्त्र दिले. तरीही मला असे का वाटे की, मराठी माणूस अजून झोपून आहे. येथील सत्ताधारी आपला कितपतं विचार करतात. ह्यांना आपण मतदान करून जिंकूण देतो का परप्रांतीय. असो!!



     आपले मराठी मुल देखील शिकले आहे. आपल्याकडे साहित्य आहे. शिक्षण आहे. आपण पण कशात कमी नाही आहोत. आता गरज आहे ती पुन्हा उभ राहण्याची, शिक्षणाच्या जोरावर प्रभूत्व मिळवणयाची. कोणासाठी तर... मराठी माणसासाठी.

मंगळवार, २८ मार्च, २०१७

शेतकरी असणं गुन्हा आहे का?

   सुका दुष्काळ, ओला दुष्काळ आणि गारपीट अशा अनेक प्रसंगाना सामोरा जाणारा शेतकरी. आपल्या मेहनतीतून घामातून लोकांसाठी पिक पिकवणाऱ्या या शेतकऱ्याच्या वाटेला नेहमी संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष का असतो? वर्षभरात कमवलेले, कर्ज काढलेले पैसे शेतीसाठी वापरूनही शेतकऱ्याच्या हाती 50 टक्केही पिक हाती लागत नाही. अशातच शेतकरी आपला उदरनिर्वाह कसा करतो? त्याच्या कुटुंबाचं होत काय? एवढेचं प्रश्न आपण विचारतो.
    गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यानं आधी आसमानी आणि मग सुलतानी संकटांना तोंड दिलं. सुरु असलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक भाजप सरकारच्या हात धुवून मागे लागलेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जासाठी तरतूद करतं, पण कर्जमाफी करत नाही.
|| एक दिवस सर्व किंमती वस्तू घराबाहेर ठेवून पाहा ||
|| शेतकरी काय असतो समजे ||
   
शेतकरी वर्षभर आपल्या शेतात सोनं पिकवत असतो. राखण करतो. स्वत:च्या काळजावर दगड ठेवून उभ्या पिकाचं रक्षण करतो. काही वेळेला गारपीट, दुष्काळ आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल होतो. तर काही वेळेला हाती पिक असूनही योग्य हमी भाव न मिळाल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो.
     शेतकऱ्याला कुटुंबं नाही का? त्याला त्याचा संसार नाही का? खरचं शेतकरी असणं गुन्हा आहे का? जर शेतकरीच संपावर गेले तर त्यांच्या अन्न धान्यांवर जगणारे. काय होईल आपलं?

शनिवार, ११ मार्च, २०१७

छंदोत्सव.


छंदोत्सव..
"छंद आहे तिथे आनंद, व्यासंग तिथे परमानंद".

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghyo5CwWpzj2NTDzpov5auWsypR3QsSOjeVSGaSH90tjje52bplmfsbJAs6QkEYjhQaM-wgiEoek-_SkEjW8DP4ZzqjrQAXxbomFCw7upx5Ml5Q8xqnQ9U6q-7PADwEyBs3WxmTkqTSR6f/s320/20170311_161525.jpg
      किती सुंदर ओळी आहेत या ओळी. नुकतीच छबिलदासच्या गल्लीतून जाताना नजर त्या छंदोत्सव नावाच्या बॅनरवर पडली. कुतूहल म्हणून का असेना एक क्षण काय असेल, म्हणून आत जाऊन पाहावं असं वाटलं. सार्वजनिक वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर हे प्रदर्शन आहे हे वाचल्याक्षणी मी तिथे गेले. प्रदर्शन फार भव्य दिव्य नव्हतं, किंवा प्रदर्शनात विकण्यासाठी वस्तूही फारश्या नव्हत्या. होती ती फक्त कला आणि तिथे भेटला तो सच्च कलाकार...
        तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते. सुरुवातीला अगदी लोकरीच्या विविध विणलेल्या वस्तू, माग हॅन्ड क्राफ्ट, पेंटिंग्स, क्विलिंगपासून बनवलेल्या नानाविध वस्तू, कागदापासून आणि टाकाऊ पासून टिकाऊ तयार केल्याजाणाऱ्या वस्तू, इतकंच काय तर अहो! आपल्याला एक छंद असतोच की, बस आणि ट्रेनची तिकीटं जपून ठेवायचा तेही होता बरं का! विविध राज्यामध्ये आणि विविध वयोगटातील व्यक्तीसाठी असणारी वेगवेगळ्या काळातली तिकीटं तिथे होती. हे कमी म्हणून की काय आतपर्यंत येऊन गेलेल्या काडेपेट्यांचे बॉक्स आणि त्यावरचे चिन्ह हा हि छंदाचा विषय असू शकतो, हे त्या निमित्ताने पाहायला मिळालं!
      मला संपूर्ण प्रदर्शनात आवडलेल्या 2 स्टॉलवर मी जरा जास्त बोलेन.एक गृहस्थ आहेत जे आवड म्हणून नारळाच्या आणि शाहळ्याच्या करवंटीपासून विविध आकार आणि वस्तू तयार करतात.तर गोगटे नावाचे दुसरे गृहस्थ आहेत जे स्वतः करवंटीपासून विविध कलाकृती तयार करून त्याचा व्यवसाय करतात.या दोघांचेही स्टॉल समोरसमोर होते फरक हा होता एकाची आवड होती जी कलेतून सादर केली आणि ती पुढच्या पिढीकडे पोहोचावी यासाठी त्याचं शिक्षण ते देत होते, तर दुसरे गृहस्थ त्याच करवंटीचा वापर करून किचन, छोटा दिवा, समई यांसारख्या गोष्टी विकण्यासाठी तयार करत होते. अजून एक वेगळा स्टॉल पाहायला मिळाला तो म्हणजे पत्त्यांचा...पत्ते म्हणजे जुगार! असं जरी समजलं जात असलं तरी विविध ठिकाणी कोणकोणत्या आणि किती प्रकारचे पत्ते वापरले जातात, याचं उत्तम उदाहरण सांगायचं तर मांजरीच्या वेगवेगळ्या जातीचं महत्व सांगणारे पत्ते,विविध आकारातील पत्ते, इतकाच काय तर A4 साईझपेक्षा थोडे कमी आकाराचे पत्तेही तिथे होते, जे भारतात छापले जातात आणि अमेरिकेत मोठया प्रमाणात विकले जातात.
      अजून एक स्टॉल होता तो शिक्के आणि नोटांचा जो मला वेगळा वाटला; पराग रेडकर नावाचे उत्तम जाण असणारे गृहस्थ. जगभरातील विविध नाणीं आणि शिक्के फक्त छंद आहे म्हणून जमवणे. हा छंद असला ; तरी त्या मागचा इतिहास आणि प्रत्येक नाण्या आणि शिक्यामगचा असणारा इतिहास त्यांचं रहस्य, त्यातली गंमत याचा अभ्यास प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ते येणाऱ्या व्यक्तीला सांगत होते. एकूणच प्रदर्शनात मला आवडलेला भाग हा शेवटचा होता कारण नुसती छंद म्हणून नाणी जमवणे खूप सोप आहे. पण त्या मागचा इतिहास आणि अर्थशास्त्र अभ्यासपूर्वक सांगणं कठीण आहे.खूप गर्दी असल्यानं आणि आणि वेळेअभावी मला त्यांची मुलाखत घेता अली नाही पण त्यांच्या ह्या अनमोल छंदाला मात्र दाद द्यावीशी वाटली.आजचा दिवस आणि तो एक तास सार्थकी लागला असे छंद आपणही जोपासायला हवेत असा एक मनात विचार ही काही क्षणांसाठी येऊन गेला.शेवटी म्हणतात ना भाव तेचि देव आणि कला तिथे भाव याचा प्रत्यय मात्र आज यानिमित्तानं का होईना आला.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6cBJ8kSxduUca0JoliJomDf4U-n9qSpktKhWUzXPxQhYKrVvw2-gr2Cqj9KG3gJHHVws0m_Q-aOozmUhT5x47CK3fqxz2geukUTQ7k23B6zsehyux_S094k8_hIXo2rS8YSq38BopRqC5/s640/20170311_161742.jpg




रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

स्वल्पविराम

कॉलेज ची बेल वाजली नुकताच कॉलेज सुटल होत.माझा काही आज वर्गात लक्ष लागत नव्हतं. मला राधाने हलवलं. मी एकदम दचकले आणि तीने माझ्याकडे बघितलं.सगळीकडे शांतता पसरली,पण क्षणभरच...
काय ग कुठे हरवलीस ?
काय बोलावे हे न सुचल्याने मी गडबडले जणू सगळे शब्दच नाष्ट झाल्यासारखे.आज कॉलेजचा तिसरा दिवस,आम्ही आमचा सगळा ग्रुप एकत्र भेटायचं ठरवलं होतं. ग्रुप तास शाळेतलाच हो, पण परीक्षा संपल्यानंतर सगळे जण सुट्टीसाठी आपल्या गावी गेले. मग फारस भेटन झाल नाही.तसे ग्रुपमधले सगळे हुशार पण तितकेच मस्तीखोर आणि उत्साही, जीवाला जीव देणारे.शाळेत सगळ्यांचा लाडका असणारा ग्रुप होता.कोणताही काम असो किंवा अभ्यासाच्याच्या बाबतीत असो कायम पहिलं नाव घ्यायचे ते आमच्याच ग्रुपचं, हे आमच्या ग्रुपचा एक वैशिष्ट्य होत म्हणा ना ; पण आता मात्र आम्ही वेगवेळग्या शाखांमध्ये शिकायला होतो. जरी वेगळे असलो तरी मनं मात्र एक होत.माझ्या मनात अनेक विचार अजूनही घोंगावत होते आणि त्याच संभ्रमित आवस्थेत आम्ही वर्गाच्या बाहेर पडलो.
"ए हाय...!कशी आहेस?"
"ओ मॅडम कुठे हरवलाय लक्ष कुठे आहे तुमचं?"
पारस एकदम समोर आला आणि त्याने टिचकी वाजवली.
हा पारस म्हणजे एकदम मस्तीखोर! पण तो असा जरी असला तरी मनं एकदम निर्मळ आणि खूप धमाल करणार आहे.दुसऱ्याच दुःख ते आपल आणि सागळ्याना जीव भावाची साथ देणारासुद्धा...
"ए काय आल्यापासून बघतोय लक्ष कुठेय तुझ अग?
विसरलीस कि काय आम्हाला?तुझ्याशी बोलतोय मी" असा म्हणत त्याने पुन्हा एकदा टिचकी वाजवली.त्याच्या त्या आवाजाने माझ्या विचारला मात्र तूर्तास लगाम बसला खरा आणि मी हसून म्हटलं,
"हा तास काहीच नाही अरे !"
"काय मग झाली का सगळी प्रक्टिकल्स वगरे ?"
"आज काय झाल मग लेकचरला?"
"आता काय बाबा माजा आहे तुझी तुला हव ते सगळं मिळाल तुझ्या मनासारखं ! "
मी अगदीच विषय टाळायाचा म्हणून विचारलं.
"काय मग आता कॅलसेस असतील ना तुझे जाणार नाहीस का आज ?"
हो ना यार...!😣
"ए पण तुला काय झालंय तुझ तोंड पडलेलं का आहे अस क्लास मध्ये काही झालं का बोल ना
ए सांग ना काय झालं?"
आज सगळे कधी नवे ते सगळे भेटणार होते आणि त्यात मला माझा प्रॉब्लेम सांगून सगळ्यांचा मूड खराब नव्हता करायचा ...
इतक्यात हर्ष आला.आता हा हर्ष म्हणजे आमचा सगळ्यांचा खूप लाडका मित्र तो सायन्सला आहे. मुळातच कुशल बुद्धिमत्ता असणारा हा हर्ष सगळीकडे आपली सायंटिस दुष्टी जागृत ठेऊन निष्कर्ष काढणे हा त्याचा धंदा...
तो आला तेव्हा माझा फारस लक्षही नव्हतं. तो काहीतरी सगळ्यांना सांगत होता. मी मात्र स्वतःच्याच विचारात..
"काय ग घरी काही प्रॉब्लेम झालाय का ?"
सगळ्यांचं तेच चालू होत; मी शेवटी वैतागून म्हटलं, नाही रे काही नाही झालाय.
"काय नाही रे घरचे ओरडले असतील नाहीतर भांडून आली असेल अजून काय असणार ...! स्पृहा
हळूहळू सगळे जण जमायला लागले प्रतिमा, स्पृहा, हर्ष केदार ,प्राची आणि मी असा आमचा ग्रुप ...प्रतिमा फार बोलणारी नाही,तर स्पृहा एकदम शांत कधीतरी एकदमच बॉम्ब फेकल्यासारखं मधेच काहीतरी बाडबडणारी...केदार तसा शॉर्ट टेम्पर होता
पटकन चिडणार पण बाकी मनान चांगला होता! आता सगळे शांत झाले होते आणि मी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होत.
मी उगीचच विषय पुन्हा टाळायचा म्हणून म्हटलं चला क्लासला उशीर होतोय जातंय ना तुम्ही मलाही लवकर. घरी जायचंय वाट पाहत असतील घरी निघूया?
केदार आधीच चिडलेला होता, त्यात माझ्या अश्या बोलण्यावर तो अजून वैतागला.
त्याने मग बोलायला सुरुवात केली, "जाऊदे ना ,नाही सांगायचं तर नको सांगू इथे सगळे जण तुझ्यासाठी थांबलेत आणि तू सोड!"
तो चांगलाच वैतागला होता. त्याचे तुटक शब्द माझ्या कानावर पडत होते. तो म्हणत होता काही तरी की, त्याच्या आई वडिलांनचा असा मत होत, त्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यावा मात्र त्याचा हट्ट होता कंपनी सेक्रेटरी होण्याचा. त्यानं घरच्यांच्या मन विरुद्ध कॉमर्सला ऍडमिशन घेतले. त्यामुळे घरचे आता रोज त्याला त्यावरून ऐकून दाखवतात रोजचा वाद असतो घरी आणि मग हा वैतागतो.
"शांत हो रे! या सगळ्याचा राग तिच्यावर काढून काय होणार आहे सांग मला ...",एक जण
आता मात्र एक क्षण सगळीकडे खूप शांतता पसरली. मी काय बोलते या कडे सगळेजण पाहत होते. मला सुरुवात कुठून करावी हेच सुचेना मग मी बोलायला हळू हळू सुरवात केली.
त्याच असं आहे की मला अर्टसला जायचा होत. खूप काही करायचंय रे मला हे कॉमर्स नको होत. पण आई बाबा ऐकायलाच तयार नाहीत, त्यांचही एका अर्थी बरोबरच आहे म्हणा, बीकॉम केल्यावर नोकरी पटकन मिळते आणि शिवाय आम्ही दोघीही मुलीच सो पुढच्या खर्चाचा विचार करता त्यांनी त्याच्या बाजून विचार केला. पण मला नाही हे मनापासून कारावास वाटत. इतक एका श्वासात बोलल्यानंतर मात्र माझ्या मनाचा बांध फुटला प्रत्येकाचेच काही ना काही प्रॉब्लेम्स होते, आणि आम्हीच एकमेकांचे सोबती होतो.
खरंच कधी कधी आपले पालक आपल्या पातळीवर येऊन का नाही विचार करत! खरच अस झाल असता तर ...
"जाऊदे .. जर तर च्या गोष्टी झाल्या अग या! असुदे पण तुला अश्या कितीतरी गोष्टी या व्यतिरिक्तही करता येतील कि म्हणजे इव्हेंट्स लेखन आणि स्पर्धा ही हा फक्त तुला घरी न सांगता करावं लागेल हे खरं ",स्पृहा
ते तर आहेच ; आता आपण आपल्या शाखा तर बदलु शकत नाही ; पण आहे त्यातून काहीतरी वेगळं एकमेकांच्या मदतीनं नक्कीच करू शकतो. ठरल तर मग आपल्या आनंदाचे मार्ग आपणच शोधायचे ! अस म्हणून नव्या उमेदीने मन जागा झाल.एक खूप चांगला संकल्प करून आम्ही सगळे कॉलेज च्या बाहेर पडलो .आजचा रस्ताही तोच होता झाडंही तीच वर्दळ हि नेहेमीचीच पण आज सगळंच कसा वेगळा आणि मोकळ वाटत होत.घर कधी आल ते कळलंच नाही. आई दारात वाट पाहतच उभी होती ."काय ग किती उशीर? लवकर यावा,आज तुझ्या आवडीची मस्त खीर केलीय जा लवकर हात पाय धूऊन घे ..."
अरे वा ! ,मी.
"काही नाही ग असाच आज  सगळे जण भेटलो मग गप्पा झाल्या तुला माहितेय का ....",मी.
माझी अखंड बडबड पुन्हा चालू झालेली पाहून आईला आज खूप बार वाटलं. इतके दिवस शांत असणारी मुलगी आज आईशी खूप मनमोकळेपणाने बोलत होती. आईच्या डोळ्यात दोन क्षण पाणी आलं आणि ती तशीच माझ्याकडे पाहत  उभी राहिली ;कारण आज तिला तिची मुलगी खऱ्या अर्थाने परत मिळाल्यासारखी होती.

गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

"मन की बात !"

    आजचा दिवस तसा कंटाळवाणाच गेला. मी आणि माझी मैत्रिण माधवी माटुंग्यात माहेश्वरी उद्यानात सहज  फेरफटका मारून येऊ म्हणून जात असतानाच वाटेत आम्हाला एक मसाला पापडची गाडी लावलेली दिसली. आम्ही दोघींही एकमेकींकडे पाहात पापड घ्यायचा विचार करत होतो.तो मसाला पापड विकणारा भैयाही नुकतीच स्वत:ची गाडी लावूनं सेटलं होत असावा.अजून पर्यंत एकही गिऱ्हाईक आलं नव्हतं कदाचीत;कारण पहिला बोवनीचा पापड तसाच भाजून ठेवला होता.
भैया दो मसाला पापड देना....एक पार्सल और एक खाने के लिए...मी वेळ न दवडता पटकन सांगितल.
हा ..तो ये लो!”
भैया वो नही!” , मी
अभी तो किया है..
नही नया बनाओ ना!”
       त्याचाही धंदा होता. तोही काही न बोलता आता मसाला पापड करण्यात व्यस्त झाला. त्याच्या सोबत असणारे त्याचे काका त्याला मदत करत होते. खूप वयस्कर नसावा तो मुलगा! आमच्या पेक्षा २ वर्षांनी मोठा असेल कदाचीत; पण बोलणं वागणं खूप आदबीच होतं. आम्ही उभे होतो त्या पलिकडच्या बाजूला बऱ्याच डिश पडल्या होत्या आणि त्या काकांनी त्या मुलाला उचलून कचरापेटीत टाकायला सांगितल्या. ‘स्वच्छ भारत’, ‘स्वच्छ सडकं’,हा सगळा प्रकार पूर्ण होईपर्यंत आम्ही पार्सल घेऊन, पैसे देऊन निघालो खरे ; पण त्यानंतर तो प्रसंग आमच्या डोक्यात घोळत होता.यावर आमच्यात सहज म्हणता म्हणता एक छान आणि वेगळीच चर्चा रंगली.
     “बघ ना! सगळीकडे स्वच्छ भारत मोहीम सुरू आहे; पण हे शेवटी त्या मुलाला का सांगावं लागलं की तो कचरा उचलून त्या कचरा पेटीत टाक...
हे तो स्वत: ही करू शकला असता ना! ,माधवी.
अगं आपण असं स्वत:हून करायची इच्छा असती तर खूप गोष्टी झाल्याच असत्या की,मी
म्हणजे? माधवीन मध्येच विचारलं
म्हणजे, आपल ना अस असतं की आपल्या मागे किंवा डोक्यावर कोणाचा तरी वचकं, दरारा लागतो,तो असला की सगळ कस निट होतं, नाहीतर बिनबोभाट असतं नाही..!
बघ ,आज स्वत:सोबत भारताला स्वच्छ ठेवा हे शाळेपासुन शिकवल जात! तरी आजच्या सरकारला त्यावर मोहीम करावी लागते आणि त्यावर काम कराव लागत या सारखं मोठं दूर्देव नाही. इथे फक्त स्वत:सोबत भारताला स्वच्छ ठेवा ह्या बरोबरच ना मन की बात मध्ये मनालाही स्वच्छ ठेवा ही योजना ही असायला हवी होती. मग कदाचीत बदल घडावा असं तरी वाटलं असतं सगळ्यांना.
 तिला माझ्या या निरागस बोलण्याची किवं आली की हसू, हेच मला समजायला दोन सेकंद गेले.
खरंच आहे ना आधी आपली मन आणि डोकी स्वच्छ करायला हवीत तर बाकी गोष्टी स्वच्छ होतीलं.
    शेवटी मनातली तुसडेपणाची,कुटीरतेची भावना तोकडी मनोवृत्तीची जळमट म्हणजे आपल्याला आरक्षण नको असतं फक्त बोलायला पण फायदाच असेलं तर हवं! जाता जात नाही ती जात संस्था नको आणि अंतरजिय विवाहही नकोत.स्रीयांचे प्रश्न आणि पुरुष प्रधान यावर वादविवाद करण्याआधी दोन्ही बाजूच्या चूका समजून घ्यायला नकोत.इथे लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत पण आम्हाला याची जाणीव ही नको आणि माणूसकीचे धडे देणारा माणूस हा कार्यकररता नेता नको. तर डोक्यातल्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे आणि नको त्या अस्मितांचे किडे जेव्हा स्वच्छ होतील तेव्हाच खरं त्या स्वच्छ भारतअभियानाला अधिक श्रेय द्याव लागेल.. या पेक्षा खूप वेगळे आणि गरजेचे प्रश्न आजही आहेत आपल्याकडे पण आपल्या मनावरच्या आणि डोळ्यावरच्या जळमटाच काय? प्रत्येक गोष्टीला अर्थातच हा विचार खूप आयडीयल हे माहित आहे ; आपण स्वत:हून यातलं २ टक्के जरी बदललं ना तरी खूप आहे. का माहीत आहे ! कारण आधी सवय लागायला हवी ती स्वशिस्तीची नेहमीच कोणाच्यातरी भीतीपोटी किंवा दबावाखाली कामं करणाऱ्या माणसाचं भवितव्य कधी उजळत् नाही आणि पर्यायानं देशाचही नाही. हो ना ?